मुंबई – देशातील विद्यमान राजकीय परिस्थितीत एकमेकांवर व्यक्तीगत द्वेषापोटी करण्यात येत असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय पक्षांकडे जनहितासाठी ठोस भूमिकेचा अभाव आणि स्वार्थी राजकारण या सगळ्या परिस्थितीतीला कंटाळलेल्या जनतेला समर्थ पर्याय निर्माण करुन देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने केवळ लोक कल्याणाचा ध्यास असणाऱ्या आणि निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींना निवडणे ही काळाची गरज आहे.त्यामुळे त्यागी वृत्तीने काम करणार्या निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह असंख्य मित्रमंडळीने त्यांच्याकडे धरला आहे.
श्री भुजबळ यांना निवडणुकीस उभे करण्याबाबत नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत भुजबळ यांनी खरोखरच निवडणुकीला उभे रहायचे का? भुजबळ यांच्यासारख्या सुसंस्कृत, अभ्यासू, सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक, राजकीय जाण व प्रशासकीय ज्ञान असलेल्या व्यक्तींनी निवडून येण्याची कशी गरज आहे, ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, त्यांची खऱ्या अर्थाने कोण सोडवणूक करु शकते ? ठाणे लोकसभा मतदार संघात कोणत्या समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागते या व अशा अनेक प्रश्नांवर सांगोपांग चर्चा झाली. मित्रमंडळीचा आग्रह, जनतेची गरज,आपले विचार लक्षात घेऊन लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू,असे यावेळी भुजबळ यांनी सांगितले. यावेळी विचारवंत,लेखक डॉ. त्र्यंबक दूनबळे,चित्रकार, समीक्षक डॉ. सुभाष पवार, सौंदर्यतज्ञ डॉ. आशिष शिरूरकर,”गप्पागोष्टी”कार जयंत ओक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अभ्यासक तथा निवृत्त तहसीलदार सुभाष कनवाळू,कथाकार गोपीनाथ देवकर गुरुजी,सामाजिक कार्यकर्त्या लीना कुलदीप आढे,सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री भीमसेन तपासे,चंद्रकांत सोनावणे,मेदारी आदी उपस्थित होते.