पुणे-राज्य सरकारने… औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्या’चे धाराशीव व पुणे शहराचे ‘जिजापुर…’ हे जिल्हा नाव बदल करावे. कारण पुणे शहराला जिजाऊंचा वसा व वारसा आहे. हे शहर राष्ट्रमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व खजिना खाली करून आपल्या ‘शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले.’ म्हणून पुण्याचे नाव ‘जिजापुर’ केलेच पाहिजे.अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत आपण सोमवारी निवेदन देणार असल्याच त्यांनी म्हटलं आहे .