पुणे- बालगंधर्व रंगमंदिर पाडु नये ती वास्तु तशीच ठेवावी .आणि तिथल्या मोकळया जागेवर अनेकांचा डोळा जरी असला तरी ती जागा तशीच ठेऊन ती रंगमंदिराचीच रहावी असं स्पष्ट मत अभिनेता ,दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यकत केेले. पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . बालगंधर्व रंगमंदिराची वास्तु न पाडता तशीचा ठेवावी आणि हवे तर अंतर्गत दुरुस्ती करावी.हल्ली मोकळया जागेवर अनेकांचा डोळा असतो तशी त्या रंगमंदिराच्या मोकळया जागेत काही न करता ती रंगमंदिराची असावी असही मत मांजरेकर यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्याच्या मुद्द्यावरून भिन्न मतप्रवाह असलेले,. तरी ते पाडून त्याच्या जागी बहुमजली रंगमंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी या रंगमंदिराच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही पुढील काही दिवसांत पूर्ण होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास प्रकल्प या योजनेत वास्तुविशारदांनी नोंदणी करून प्रक्रिया करण्यास प्रारंभ केला असल्याचे असे महापालिकेच्या भवन रचना विभागाने म्हटले आहे.२१ जानेवारी पर्यंत हि प्रक्रिया पूर्ण होणार आहे .पूर्वी सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांनी या प्रकल्पाला आक्षेप घेतला होता. मात्र या प्रकल्पाची प्रत्यक्षात कार्यवाही सुरु झाल्यावर , प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी या पुनर्विकास प्रकल्पाला प्रखर विरोध दर्शविला .कुठल्याही राजकीय पक्षांच्या सांस्कृतिक विभागांनी आजपर्यंत यास कडाडून विरोध केलेला नाही हे विशेष . अलीकडेच स्थापन झालेल्या एका राजकीय कार्यकर्त्याच्या सांस्कृतिक संघटनेमार्फत आमिषे दाखवून या प्रकल्पाचा विरोध मोडून काढण्याचे काम सुरु असल्याची चर्चा आहे.