‘नवे पर्व, युवा सर्व’ असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन
केले.’आम्ही दोघी’ ही नवीन मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. आम्ही दोघीमालिकेचं कथानक
मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मी
रा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणिस्वच्छंदी आहे. सध्या मालिके
त प्रेक्षक मीरा आणि आदित्यमधील वाढती मैत्री व त्या मैत्रीचं प्रेमात झालेलं रूपांतर पाहत आहेत.
आदित्यने जेव्हा त्याच्या प्रेमाचा खुलासा मीरासमोर केला तेव्हा मीराने देखील तिचा वेळ घेऊन त्याला होकार दिला.
मीराने आदित्यच्या प्रेमाचा स्वीकार केल्यामुळे आदित्य सध्या खुश आहे. मीरापण प्रेमाचे नवे नवे दिवस एन्जॉयकरते
आहे. अथर्वला जेव्हा आदित्यचा वाढदिवसाबद्दल कळतं तेव्हा तो मीराला सांगतो. मीरा आणि अथर्व त्याच्या बर्थडेचा प्
लॅन करतात. मीरा गच्चीत आदित्यला सरप्राईज द्यायचं ठरवते. केक कटिंग करत असताना नेमकी मधुरागच्चीवर येते आ
णि तिला प्लॅनबद्दल न सांगितल्यामुळे ती चिडते. कशीबशी परिस्थिती सावरून आदित्यचा बर्थडे सेलिब्रेट होतो.
अशा सर्व परिस्थितीमध्ये मीरा आणि आदित्य एकमेकांसाठी कसा वेळ काढतील? किती दिवस मीरा आणि आदित्य स्व
तःचे प्रेम लपवून ठेवतील?

