साहित्यिकांनी मराठी भाषेच्या दर्जाशी तडजोड करू नये सिराज शिकलगार यांचे प्रतिपादन; बंधुता दिन व ‘बंधुता काव्य महोत्सव’चे उद्घाटन

Date:

पुणे : “मराठी भाषा टिकवण्यासाठी साहित्य निर्मितीत शुद्ध लेखन व व्याकरण कटाक्षाने तपासले पाहिजे. अलीकडच्या काळात आभासी माध्यमाच्या वापरामुळे लेखनात याकडे दुर्लक्ष होत आहे. लेखकांनी पुस्तक आणि आभासी माध्यमांवरील लेखन यातील फरक समजून घेत मराठी भाषेच्या दर्जाशी तडजोड करू नये,” असे प्रतिपादन लेखक व कवी सिराज शिकलगार यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रितम प्रकाश महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित बंधुता दिन व ‘बंधुता काव्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सिराज शिकलगार बोलत होते. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजिला होता.
प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, बंधुता काव्य महोत्सवाचे अध्यक्ष कवी शंकर आथरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, लेखिका डॉ. माधवी खरात, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, रजनी पाचंगे, संयोजक प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. अनंत सोनवणे, प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनंत सोनवणे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन रंगले. ‘बंधुता प्रकाशपर्व साहित्य पुरस्कार’ सिल्लोड येथील कवी नारायण खेडकर यांना, ‘बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार’ पलूस येथील कवी नामदेव जाधव यांना, तर ‘बंधुता प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार’ पाथर्डी येथील दिनेश मोडोकर यांना प्रदान करण्यात आले. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘आई म्हणते’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले.
सिराज शिकलगार म्हणाले, “समाजाला दिशा दाखवण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. प्रस्थापित साहित्यिकांनी नवोदितांना प्रोत्साहन द्यावे. बंधुतेची चळवळ विस्तारण्याची गरज आहे. बंधुतेचे तत्व आणि मराठीचा संस्कार रुजण्यासाठी असे महोत्सव उपयुक्त आहेत.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “माणसे जोडण्याचा, बंधुभाव जोपसण्याचा माझा छंद आहे. बंधुतादिन साजरा होतोय, याचा आनंद आहे. बंधुतेचा विचार आपल्या प्रगतीसाठी महत्वाचा असून, त्यातूनच सामाजिक समानता प्रस्थापित होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.”

शंकर आथरे म्हणाले, “कसदार, आशयघन काव्यासाठी कवीला निसर्ग आणि माणसांकडे सूक्ष्मपणे पाहावे लागते. संवेदना प्रत्येकाला असतात; पण त्याचे कवितेत रूपांतर करण्यासाठी कवी मातृह्रदयी असावा लागतो. कविता आपले अंतरंग, दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असते.”

डॉ. माधवी खरात, डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोक पगारिया, रजनी पाचंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच रोकडे यांचे अभीष्टचिंतन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...