Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उद्धव ठाकरेंचे भाषण तर ‘शिमगा’ त्यावर काय प्रतिक्रिया देणार -खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच- फडणवीस

Date:

पुणे-

दसरा मेळाव्याच्या माध्यमातून खरी शिवसेना कोणाची हे सर्वांना समजले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणती आहे हे मुंबईतील दसरा मेळाव्यातून दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यात आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विधानसभा आम्हीच जिंकणार

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवाजी पार्कपेक्षा बीकेसी मैदानाची क्षमता मोठी आहे. तरीही बीकेसीचे मैदान तुडुंब भरले होते. राज्यभरातून या मेळाव्यास लोक आले होते. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचीच सेना खरी असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेवर आणि विधानसभेवर आम्हीच भगवाच फडकवणार.

ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलावा

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, शिमग्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते. कारण उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात शिमग्या पलीकडे काहीच नव्हते. उद्धव ठाकरे नेहमी नेहमी एकच स्क्रिप्ट वाचत असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता नवीन स्क्रिप्ट रायटर बोलवावा. नेहमी तेच तेच बोलण्यापेक्षा त्यांनी नवीन कल्पना तरी भाषणात आणल्या पाहिजे. त्यांचे एकसारखे भाषण ऐकून कंटाळा आला आहे.

भाषणे ऐकली नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी काल नागपूरमध्ये धम्म चक्रप्रवर्तन कार्यक्रमात होतो. त्यामुळे कालची शिंदे व ठाकरे या दोघांची भाषणे मी ऐकू शकलो नाही. परंतु दोन्ही भाषणांचा सारंश माझ्याकडे आला. नागपूरमध्ये माझे कार्यक्रम झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण काही प्रमाणात मी पाहिले. त्यात शिंदेंनी खरी शिवसेना कोण हे दाखवून दिले आहे.

म्हणूनच ठाकरेंवर अशी वेळ

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यातील भाषणावरुन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर फडणवीस म्हणाले, अजित पवारांनी दसरा मेळाव्यावर काय प्रतिक्रिया दिली, हे मला माहिती नाही. परंतु मूळ शिवसेनेचा विचार उद्धव ठाकरे यांनी बाजूला टाकला व ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसला जाऊन मिळाले. ज्यांचे मुंबईतील बाॅम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहे, अशा लोकांसोबत बसणे ठाकरेंनी मान्य केले. जे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रोज शिव्या देतात अशा लोकांसोबत ठाकरेंनी हातमिळवणी केली. म्हणूनच ठाकरेंवर अशी वेळ आली.

शिंदेंनी विकासाचा मुद्दा मांडला

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिमग्यावर सुज्ञ लोक प्रतिक्रिया देत नसतात. त्यामुळे ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाबाबत मी काही बोलणार नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरही भर दिला. महाराष्ट्रात आगामी काळात काय-काय विकास करायचा आहे, याची रुपरेषा त्यांनी मांडली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंच्या भाषणात असे कधीही आढळले नाही. उद्धव ठाकरे हे नेहमी शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनच भाषण करत होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...