अर्णबप्रकरणी आज हायकोर्टात नेमकं काय घडलं?

Date:

मुंबई: अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई हायकोर्टाकडून तातडीचा दिलासा मिळू शकला नाही. आता तक्रारदार आणि राज्य सरकारचे उत्तर आल्यानंतरच उद्या अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्णब यांना आजची रात्रही न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे. 

उद्या, शुक्रवारी दुपारी ३ वाजता सुनावणी

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या कोठडीला आव्हान देत अर्णब यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली असता तात्काळ सुटकेचा दिलासा अर्णब यांना मिळू शकला नाही. ‘अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाने १६ एप्रिल २०१९ रोजीच पोलिसांचा ए-समरी अहवाल स्वीकारून हे प्रकरण बंद केलं होतं. त्याला पीडित नाईक कुटुंबानं आव्हान दिलं नाही आणि तो अहवाल आजही तसाच आहे. पोलिसांनीही पुन्हा तपास सुरू करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेतली नसून स्वत:हूनच फेरतपास सुरू केलाय. कायद्यानुसार याला परवानगीच नाही. त्यामुळे गोस्वामी यांचे गजाआड राहणे पूर्णत: बेकायदा आहे’, असा युक्तिवाद गोस्वामींसाठी त्यांच्या वकिलांनी मांडला. मात्र, फिर्यादी आणि पोलिसांचे म्हणणे ऐकल्याविना आदेश करू शकत नाही, असं स्पष्ट करत न्यायालयानं जामिनावरील सुटकेविषयी उद्या, शुक्रवारी दुपारी ३ वाजता सुनावणी ठेवली.

आजच्या सुनावणीतील ठळक बाबी…

– अर्णब गोस्वामी यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी. गोस्वामींच्या तात्काळ जामिनासाठी सुद्धा अॅड. आबाद पोंडा यांच्यामार्फत अर्ज करण्यात आला.

– पोलिसांनी स्वत:हूनच केस पुन्हा ओपन करून तपास सुरू केला आहे. कायद्यानुसार त्याला परवानगीच नाही पण सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे, हे मी कोर्टात बोलू इच्छित नाही. त्यामुळे पुन्हा तपास सुरू करणे आणि गोस्वामींना अटक करणे ही बाब पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा अॅड. पोंडा यांचा युक्तिवाद.

– दोन दिवसांनी दिवाळीच्या सुटीमुळे उच्च न्यायालय कदाचित आमच्यासाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे हायकोर्टाने आपल्या विशेषाधिकारात याचा विचार करावा आणि या प्रकरणात नागरिकाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे हायकोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करून अंतरिम दिलासा द्यावा, अशी पोंडा यांची विनंती.   – आम्ही दंडाधिकारी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला तर दंडाधिकारी कोर्टाने योग्य वेळी ऐकू असे सांगितले. त्यामुळे आम्ही तो अर्ज दुपारी १.३० वाजता मागे घेतला. आता अलिबाग सेशन्स कोर्टात जामीन अर्जावरील सुनावणीसाठी प्रयत्न आहे. गोस्वामी यांनी गजाआड राहणे, प्रत्येक सेकंदासाठी बेकायदा आहे – अॅड. पोंडा- अर्णब गोस्वामी प्रकरणात दिवंगत अन्वय नाईक यांची कन्या आज्ञा नाईकचीही मुंबई हायकोर्टात धाव. पोलिसांनी गेल्या वर्षी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला फौजदारी रिट याचिकेद्वारे दिले आव्हान.- अर्णब गोस्वामी यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी आणि त्वरित सुटका होण्यासाठी केलेल्या फौजदारी रिट याचिकेसोबतच आज्ञा नाईकच्या याचिकेवरही मुंबई हायकोर्टात न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी.- अन्वय नाईक आणि कुमुद नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिस उपअधीक्षकांनी १६ एप्रिल २०१९ रोजी समरी अहवाल देऊन पुरावे नसल्याने खटला बंद करण्याची विनंती केली होती. ती मान्य करत दंडाधिकारी न्यायालयाने खटला बंद केला होता. प्रकरणात पुन्हा काही आढळले असले तरी ते आधी दंडाधिकारी कोर्टाला दाखवल्याविना पोलीस पुन्हा केस ओपन करून तपास सुरूच करू शकत नाहीत -अॅड. पोंडा- पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर नाईक कुटुंबीयांतर्फे कोणीही दंडाधिकारी कोर्टात कधी दादच मागितलेली नाही – अॅड. पोंडा
– आम्ही नोटीस जारी करून तक्रारदार आणि राज्य सरकारला उत्तर देण्याची संधी देऊ आणि उद्या जामीन अर्जाविषयी सुनावणी घेऊ – हायकोर्ट

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...