वंचित समाजाला सत्ता मिळवून देणार -अँड.प्रकाश आंबेडकर

Date:

पुणे -महाराष्ट्रतील ज्यांना सत्तेपासून कायम दूर ठेवण्यात आले अश्या दुर्लक्षित आणि वंचित समाजाला एकत्र करून त्यांना सत्तेत वाटा मिळवून देणार असल्याचे अँड.प्रकाश आंबेडकर यांनी वडार समाज सत्ता संपादन मेळाव्यात म्हटले आहे .पुणे शहरात वडार समाजाच्या सत्ता संपादन मेळावाप्रसंगी ते बोलत होते या मेळाव्याला पुणे शहरातील वडार समाज मोठया संख्येने सहभागी झाला होता .
        पुढे ते म्हणाले की भाजपा चोरांचा पक्ष होऊ लागला आहे का काय असं वाटू लागलं असल्याचा टोला वंचित आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.  “राष्ट्रवादी संधीसाधूंचा पक्ष होता. त्यामुळे ज्यांना आपल्याला पक्षातून जिंकता येणार नाही असं वाटतं होतं, त्यांना भाजपात गेल्यानंतर विजय होईल असं वाटत आहे. त्यामुळे हे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. काँग्रेसचीदेखील हीच परिस्थिती आहे. दोघांचं पक्ष म्हणून असणारं अस्तित्त्व कमी होत चाललं आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी चौकशी लागलेले सगळेजण भाजपात जात असल्या कारणाने भाजपा चोरांचा पक्ष होतोय का काय असं वाटू लागलं असल्याचा टोला लगावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणासंबंधी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी देशातील आरक्षण धोक्यात आलं असल्याचं सांगितलं. “ज्यांना आरक्षण मिळतंय त्या सगळ्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा ज्याप्रमाणे मुफ्ती मेहबूबा यांना वापरत काश्मीरमध्ये पाय रोवला आणि नंतर कलम ३७० काढून घेतलं त्याप्रमाणे सत्ता आल्यानंतर आरक्षण काढून घेतलं जाईल”, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील निवडणुका संपल्यानंतर पूर्ण सत्ता हातात आल्यानंतर आरक्षण काढून घेण्यात येईल असा दावा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. आरक्षित वर्गाने सावध होण्याची हीच वेळ आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
 ऑक्टोबरच्या आधी निवडणुका झाल्या पाहिजेत. आम्ही कोणासाठी थांबणार नाही, आम्ही आगेकूच करणार असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच आमच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांचाच आम्ही निवडणुकीसाठी विचार करणार. वंचित बहुजन आघाडी इथपर्यंत आणली त्यांचाच विचार करणार, बाहेरच्यांचा नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
        यावेळी या मेळाव्याचे संयोजक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की महाराष्ट्रतील संपूर्ण वडार समाजची ताकत प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभी करणार आहे तसेच वडार समाज हा अंत्यत इमानदार आणि कष्ट करणारा आहे आजपर्यंत सर्वानी या समाजाचा वापर केला परंतु या समाजाला फक्त वंचीत आघाडी न्याय देऊ शकते .
       यावेळी काँग्रेस पक्षाच्या सारचितनीस प्रभाताई वाडकर तसेच लष्कर ए भिमाचे संस्थापक सचिन धिवार यांनी वंचित आघाडीमध्ये आज जाहीर प्रवेश केला .
       या वेळी वंचित आघाडीचे प्रदेश महासचिव अनिल जाधव ,वंचित आघाडी आणि धनगर समाजाचे नेते नवनाथ पडळकर प्रवक्ते संतोष संखंद आदी मान्यवर उपस्थित होते
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...