आसाम-मेघालय बॉर्डरवर हिंसाचार:पोलिसांच्या गोळीबारात 6 ठार , 7 जिल्ह्यांत इंटरनेट केले बंद

Date:

गुवाहाटी-लाकडाची तस्करी रोखण्याच्या मुद्यावरून मंगळवारी भयंकर हिंसाचार झाला. त्यात एका वन रक्षकासह 6 जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिसांनी लाकडांची अवैध तस्करी करणाऱ्या एका ट्रकला थांबवले होते. त्यानंतर हा हिंसाचार झाला. खबरदारी म्हणून या भागातील 7 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पश्चिम कार्बी आंगलोंगचे पोलिस अधीक्षक इमदाद अली यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आसाम वन विभागाने मेघालयच्या सीमेवर लाकडांची तस्करी करणाऱ्या तस्करांचा एक ट्रक थांबवला होता. त्यानंतरही ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवण्यासाठी वन रक्षकांनी गोळीबार केला. त्यात ट्रकचे टायर पंक्चर झाले. त्यानंतर ट्रक चालकासह 3 जणांच्या मुसक्या आवळल्या. इतर संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.दुसरीकडे, प्रशासनाने खबरदारी म्हणून मेघालयच्या 7 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी या प्रकरणी मेघालय पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती लगतच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली. तसेच अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली. सकाळी 5 च्या सुमारास ही कुमक पोहोचताच स्थानिक नागरिक हातात शस्त्र घेऊन तिथे धडकले. त्यांनी तस्करांना सोडण्याची मागणी करत वन रक्षक व पोलिसांना घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी गोळीबार करावा लागला.या गोळीबारात वन रक्षकाचा मृत्यू झाला. तसेच मेघालयच्या 5 नागरिकांचाही बळी गेला. हिंसाचारात जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वन रक्षकाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही. या घटनेचा तपास सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई -महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी...

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात प्रखर मत..

मुंबई – लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली...

उद्या 12 झेडपी, 125 पंचायत समित्यांसाठी मतदान:2193 जागा, 7438 उमेदवार; 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार करणार फैसला

मुंबई-राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या...

‘शून्य कचरा प्रकल्पा’त दररोज कचरा संकलन-आमदार हेमंत रासने यांची माहिती

पुणे, ता. ६ : कसबा-भवानी विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेच्या वतीने...