पुणे- धर्मनिरपेक्षता व सर्वधर्म समभाव हे शब्द संविधानाच्या कागदावरच राहिलेत कि काय ? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती आहे , पण आज सर्व धर्म संभाव हि काळाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी येथे केले.
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमहोत्सव सोहळ्याच्या द्वितीय सत्राच्या कार्यक्रमात सर्वधर्मीयांकडून शिवरायांना मानवंदनेचा कार्यक्रम लाल महालात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सर्वधर्मीय प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
त्या प्रसंगी पासलकर म्हणाले आजकाल धर्मनिरपेक्षता व सर्वधर्म समभाव हे शब्द संविधानाच्या कागदावर राहिलेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु धर्मनिरपेक्षता व सर्वधर्म समभाव छत्रपती शिवरायांनी आपल्या आयुष्याचा सार म्हणून कृतीत उतरवले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात अहिंदू-प्रजा सुखात नांदत होती, त्यांचे हक्क सुरक्षित होते. त्यांचा धर्म त्यांना स्वाभिमानाने प्रतिष्ठेने पळता यावा यासाठी महाराज दक्ष आणि जागरूक होते. त्यांनी सर्व धर्मियांचा आदरभाव क्रियाशीलपणे जपला होता. स्वतःच्या धर्मावर प्रेम करता करता ते सर्वच धर्माच्या विषयी नितांत आदरभाव जोपासत होते. सतराव्या शतकातील धर्मश्रद्ध वातावरणात शिवरायांच्या रूपाने धर्माच्या नावाने परंपरेची गुलामी उभी नव्हती, तर धर्माच्या नावाने नैतिक माणसाचे स्वातंत्र्य साकारत होते आणि त्यामुळेच छत्रपती शिवराय हे धर्मनिरपेक्ष राजे होते असे आम्ही मानतो असे प्रतिपादन विकास पासलकर यांनी केले. लोकराजा छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीयांकडून शिवरायांना मानवंदनेचा अभिनव उपक्रम 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिनाच्या दिवशी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून साजऱ्या होत असलेल्या शिवजन्मोत्सवात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सारनाथ बौद्ध विहाराचे उपाध्यक्ष दीपक धनविज, ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष सगाई नायर, लिंगायत धर्माचे प्रतिनिधी स्वप्नील भासमारे, मुस्लिम धर्मीय प्रतिनिधी अंजुम इनामदार, हरियाणा मराठा सेवा संघाचे कमलजित महाले, हरियाणा पोलीस धरम प्रकाश, उद्योजक सत्येंद्र दाभाडे, विजयराव घाडगे, हिंदुराजे प्रतिष्ठाण वारजे पुणे हे उपस्थित होते. कैलास वडघुले यांनी सूत्रसंचालन केले, तर दत्ताभाऊ पासलकर यांनी आभार मानले. संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, जितेंद्र साळुंखे, श्रीकांत बऱ्हाटे, विराज तावरे, संतोष शिंदे, युवराज ढवळे, मयूर शिरोळे, मंदार बहिरट, निलेश इंगवले, अक्षय रणपिसे, सचिन जोशी आदी उपस्थित होते.

