राज्यात महायुती २२० नाही तर २५० पार जाणार … पुण्यातील आठही जागा जिंकणार ; कोथरूडचा लीड १.६० लाखांवर…चंद्रकांत दादांचा विश्वास

Date:

पुणे-सकाळपासूनच प्रचंड उत्साहात नागरिकांनी केलेल्या मतदानामुळे राज्यात महायुती २२० नाही तर २५० हून अधिक जागांवर विजय होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.
मतदानाला बाहेर पडणाऱ्या नागरिकांची देहबोली पाहता पुण्यातील आठही जागांवर भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार विजयी होतील. तसेच कोथरूडमध्ये मला १.६० लाखांहून अधिक आघाडी मिळेल असा ठाम विश्वासही चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाचा आढावा चंद्रकांत दादा पाटील यांनी विविध मतदान केंद्रांवर जाऊन घेतला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.


विरोधकांनी केलेला कांगावा, याचा मतदारांवर जराही परिणाम झालेला दिसून येत नाही, असे स्पष्ट करून चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, गेल्या चार दिवसात हवा फिरली आहे, असे शरद पवार यांचे विधान अनाकलनीय आहे. हवा कोणत्या बाजूने फिरली आहे हे मात्र पवार साहेबांनी स्पष्ट केलेले नाही. नेहमीप्रमाणेच त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. हवा नक्कीच फिरली आहे पण ती पूर्णपणे महायुतीच्या बाजूने. विरोधकांमधील बेबनाव, कांगावा आणि विकासाच्या दृष्टीचा अभाव, यामुळे नागरिक आपला ठाम पाठिंबा देत आहेत तो महायुती च्या बाजूने, असे स्पष्ट निरीक्षण देखील पाटील यांनी नोंदवले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड

मुंबई, दि. २५ फेब्रुवारी २०२६: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा...

ईडीने अनिल अंबानींचे 3716 कोटी रुपयांचे 17 मजली घर केले जप्त : 40 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू

मुंबई-अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचा...

अबब गुटखा विक्री प्रकरणी ५ वर्षांत १८ हजार आरोपी गजाआड ! २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त- मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

आमदार जगताप यांच्या विधानसभेतील तारांकित प्रश्नानंतर धक्कादायक माहिती उघडमुंबई...

बांधकाम साईट्सवर प्रदूषण सेन्सर बंधनकारक:’क्लिन एअर पोर्टल’ डॅशबोर्डचे लोकार्पण, पातळीवर लक्ष ठेवणार-महापौर मंजुषा नागपुरे

पुणे -शहरात बांधकामांच्या ठिकाणी होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल...