पाच शाळांमध्ये ‘प्लास्टिक कलेक्शन’ प्रकल्पाचे आयोजन विद्यार्थ्यांकडून 125 किलो प्लास्टिक कचरा जमा
पुणे :
‘वनराई ट्रस्ट’च्या वतीने ‘स्वच्छ पुणे’ या उपक्रमातंर्गत ‘प्लास्टिक आणि ई – वेस्ट फ्री’ प्रकल्पामध्ये ‘प्लास्टिक कलेक्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या उपक्रमाचा प्रारंभ ‘महावीर इंग्लिश मीडिरम हायस्कूल’, महर्षीनगरमध्ये झाला. या उपक्रमांतर्गत सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून 125 किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.
‘महावीर इंग्लिश मीडिरम हायस्कूल’ येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलताना वनराईचे अध्यक्ष, रवींद्र धारिया म्हणाले, ‘पुणे शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आणि महानगरपालिकेवरील ताण कमी व्हावा यासाठी वनराईच्या पुढाकाराने व इतर संस्थांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्लास्टिक कचरा आणि ई-कचरा पर्यावरणाला घातक आहे. प्रत्येक नागरिक यामध्ये कसा सहभागी होईल, यासाठी वनराई प्रयत्न करत असते, समाजाला आपण काहीतरी द्यायला पाहिजे, हे आपले कर्तव्य आहे. याची सुरुवात विद्यार्थ्यांपासून करण्याचा आमचा मानस आहे. शाळांप्रमाणेच शहरातील सोसायट्यांमध्ये हा उपक्रम वनराईच्या वतीने राबविण्यात येणार आहे.’
या वेळी विजयकांत कोठारी (‘महावीर प्रतिष्ठान’चे कार्याध्यक्ष), अलकनंदा सेनगुप्ता (‘महावीर इंग्लिश मीडियम हारस्कूल’च्या मुख्याध्यापक), धन्यकुमार चोरडिरा, विनीत बियाणी, सीमा बियाणी, ललित राठी (क्लीन गार्बेज), गणेश शिरोडे (एनव्हायर्मेंट क्लब ऑफ इंडिया), मुकुंद शिंदे (वनराई), राहुल काकंरिया, विनोद बोधनकर (सागर मित्र), अरूण गांधी उपस्थित होते.
‘महावीर इंग्लिश मीडियम हायस्कूल’च्या मुख्याध्यापिका अलकनंदा सेनगुप्ता यांचे या उपक्रमास मोलाचे सहकार्य मिळाले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना ‘प्लास्टिक आणि ई-वेस्ट’ कचर्याविषयी मार्गदर्शन केले. नाना क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पन्नालाल लुंकड संचलित सौ. विमलाबाई लुंकड प्राथमिक शाळा, श्रीकांत भडके म.न.पा. इंग्रजी व मराठी माध्यम शाळा क्रमांक 105 व 66 येथे देखील या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुवर्णा साठे, उज्वला सव्वाशे, रामेश्वर मोरे, पूनम राजपूत, पंडीतराव सातपुते (पन्नालाल लुंकड शाळेचे मुख्याध्यापक), मुकुंद जाधव, विजया सातारकर, कांचन भरणे या सर्व शिक्षकांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांकडून जमा झालेला प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे, असे क्लीन गार्बेजचे ललित राठी यांनी सांगितले. ‘वनराई’च्या वतीने शाळेमध्ये प्लास्टिक कचरा साठविण्यासाठी पिशव्या देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या पिशव्यामध्ये कचर्याचे संकलन करायचे आहे, असेही यावेळी आवाहन करण्यात आले.