Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘जलसंवर्धन पंचायत- एक लोकचळवळ’ या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Date:

‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया यांना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र

फडणवीस यांच्या हस्ते मंगल कलश प्रदान

‘वनराई’च्या पुढाकाराने आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ व

‘झी-24 तास’ यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार्‍या ‘जलसंवर्धन

पंचायत- एक लोकचळवळ’ या मोहिमेचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र

फडणवीस यांच्या हस्ते झाला. शुभारंभाचे प्रतिक म्हणून मुख्यमंत्र्यांच्या

हस्ते ‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया यांना मंगल कलश प्रदान

करण्यात आला. ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र

शासनाचा पर्यावरण विभाग’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’,

यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यामध्ये दि. 7 जून, 2016 रोजी

‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई’ येथे हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम,

पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव श्री.

स्वाधीन क्षत्रिय तसेच ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे सचिव डॉ. पी.

अनबलगन व ‘झी-24 तास’चे संपादक डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते.

‘‘जल संवर्धनाच्या कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी ही मोहीम अतिशय

मार्गदर्शक ठरेल,’’ असा विश्‍वास मा. मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

या मोहिमेच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभागी असलेल्या

महाराष्ट्रातील विशेषतः बीड, परभणी, हिंगोली, लातूर, जालना, उस्मानाबाद,

वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा,

सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमधील ‘वनराई’चे सुमारे250 कार्यकर्ते व

ग्रामस्थ या सोहळ्याला उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा,

यासाठी वनराईचे मुख्य प्रकल्प संचालक श्री. जयवंत देशमुख यांनी विशेष

मोहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भातील माहिती ‘महाराष्ट्र प्रदूषण

नियंत्रण मंडळा’चे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी या सोहळ्याच्या

प्रास्ताविकातून दिली. प्रत्येक गावातच जल संवर्धनाच्या उद्दिष्टाने प्रेरित

तरुण पिढी निर्माण झाली, तर दुष्काळग्रस्त गावांचे चित्र बदलायला वेळ

लागणार नाही. या तरुण पिढीच्या पुढाकारातून पाण्याचे मोजमाप,

नियोजन, व्यवस्थापन व संवर्धन करणारी व्यवस्था गावपातळीवर उभी

करता येईल. याशिवाय मृदा संवर्धन, गवताळ कुरणे व वृक्षलागवडीच्या

कार्यक्रमांनाही चालना देता येईल, तसेच कमी पाण्यात येणारी पिके घेण्यास

आणि सूक्ष्म सिंचनाच्या वापरास शेतकर्‍यांना प्रवृत्त करता येईल. दुष्काळ

निर्मूलनाचा हा विकेंद्रित आणि एकात्मिक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून

गावोगावच्या तरुण पिढीला सक्रिय करण्यासाठी ‘वनराई’, ‘महाराष्ट्र प्रदूषण

नियंत्रण मंडळ’ आणि ‘झी-24 तास’ यांच्या संयुक्त सहकार्याने ‘जलसंवर्धन

पंचायत – एक लोकचळवळ’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या

अभियानाची सुरुवात महाराष्ट्रातील 100 गावांपासून करण्यात येत असून,

दरवर्षी टप्प्या-टप्प्याने याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या

उपलब्धतेबरोबरच पाणी टंचाईच्या समस्येचे निवारण होईल, तसेच भूजल

पातळीत आणि शेतीच्या उत्पादनातही वाढ होईल. पडीक जमिनी

उत्पादनक्षम होतील. जनावरांना चारा-पाणी उपलब्ध होईल. पर्यावरणाचा

समतोल राखला जाईल. रोजगाराच्या संधी निर्माण होऊन शेतकर्‍यांच्या

आत्महत्या आणि शहराकडील स्थलांतराला आळा बसेल,’’ असा विश्‍वास

‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त

केला, तसेच या मोहिमेला खर्‍या अर्थाने लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त

करून देण्यासाठी सर्वांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही

त्यांनी यावेळी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...