Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अल्टिमेटम आपल्या घरात ;राज्यात चालणार नाही, इथे हुकुमशाही नाही -उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

Date:

मुंबई-महाराष्ट्रात काम करताना कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही. कायद्याचं राज्य आहे, हुकुमशाही चालणार नाही अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरेंना खडसावलं आहे. “महाराष्ट्रात काम करत असताना कोणीही असं अल्टिमेटम देऊ शकत नाही. हे कायद्याचं राज्य आहे. इथे कोणाचीही हुकुमशाही चालणार नाही. जर कोणाला असं वाटत असेल की मी असं म्हटलं तर तसं होईल तर ते चालणार नाही. मग अजित पवारनेही हुकुमशाही केलेली चालणार नाही,” असं अजित पवार म्हणाले आहेत.“कायद्याने, संविधानाने, नियमाने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं पालन सर्वांनाच करावं लागेल. सर्व पक्षाच्या नेत्यांना नागरिकांना, ग्रामस्थांना करावा लागेल,” असं अजित पवारांनी सांगितलं.

अल्टिमेटमची भाषा कुणीही करू नये, असा इशारा आज अजित पवार यांनी दिला आहे. राज्यात कायद्याचेच राज्य आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेण्याचे कुणी धाडस केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी 4 मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे काल राज्यात अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील सामाजिक सलोखा न बिघडवण्याचे आवाहन विरोधकांना केले. तसेच, कुणीही उग्र आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होईलच, असा इशाराच त्यांनी राज ठाकरेंना दिला. राज्यातील पोलिस यासाठी सक्षम असल्याचे अजित पवार म्हणाले.

राज्यात हुकुमशाही नाही!राज्य कायद्यानुसारच चालते.

राज्यात कुणाची हुकुमशाही नाही. त्यामुळे राज्यात अल्टिमेटमची भाषा चालणार नाही. तुम्हाला काय अल्टिमेटम द्यायचा असेल तो आपल्या घरात देऊ शकता. मात्र, जाहीर अल्टिमेटम कुणीही देऊ नये. ते खपवून घेणार नाही, असे अजित पवार म्हणाले.सर्व धर्मियांसाठी नियम समानभोंग्यांबाबत सुप्रीम कोर्टाने 2005 मध्येच नियमावली जारी केली होती. राज्यातही त्याची अंमलबजावणी केली जाईल. सर्व धर्मियांसाठी समान नियम लागू केले जातील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मशिदींसोबतच मंदिर, चर्च, गुरुद्वारा अशा सर्वच धर्मियांसाठी भोंग्यांचे नियम समान असतील. शिर्डीच्या साई मंदिरालादेखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच भोंग्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर सर्व धार्मिक विश्वस्तांनीही परवानगी घेऊनच भोंगे लावावेत, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. तसेच, हे भोंगे कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे ते नोटीस दिल्यानंतर एका दिवसात बंद होणार नाहीत. त्याला वेळ द्यावा लागेल. मात्र सर्व भोंगे नियमानुसारच वाजावेत, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. मात्र, यावरून कुणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची बैठक

सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही, असे म्हणणाऱ्या राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर काय पाऊल उचलायचे, यावर चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, हीच सरकारची भूमिका आहे. त्याबाबत ओबीसी समाजाने मनात कुठेही किंतु बाळगू नये. ओबीसी समाजाला पुर्ववत आरक्षण मिळावे, यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...