पुण्यात भारताची पहिली अरोमाथेरपी हेअर केअर श्रेणी सादर

Date:

अरोमाथेरपी (सुगंधोपचार) क्षेत्रातील प्रवर्तक असलेल्या ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिकने आपली खास अरोमाथेरपी हेअर केअर श्रेणी पुण्यात प्रथमच सादर केली आहे. ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिकसाठी सौंदर्य हे समग्र असून ते आंतरिक व बाह्य अशा दोन्ही सौंदर्यांवर अवलंबून असते. त्याचीच पूर्तता करण्यासाठी या ब्रँडने अशी खास केश निगा श्रेणी (हेअर केअर रेंज) सादर केली आहे, जी व्यक्तीला सौंदर्य, तसेच भावनात्मक, मानसिक, शारीरिक व सौंदर्यात्मक आत्मविश्वासाची अनुभूती मिळण्यास मदत करेल. ही श्रेणी पॅराबेन्स, पेट्रोकेमिकल्स, थॅलेट्स, सल्फेट्स, विषारी घटक, कृत्रिम रंग व गंध यापासून संपूर्णपणे मुक्त आहे.

या हेअर केअर रेंजमध्ये क्रीम कंडिशनर, डँड्रफ कंट्रोल शाम्पू, हेअर ऑइल, हेअर सेरम, हेअर फॉल कंट्रोल शाम्पू, लीव्ह-इन स्प्रे कंडिशनर, मॉइश्चर बूस्ट शाम्पू, ऑइल बॅलन्सिंग शाम्पू, ऑयली स्काल्प बॅलन्सिंग टोनर अँड शाईन व व्हॉल्युम शाम्पू या उत्पादनांचा समावेश आहे. याखेरीज अरोमाथेरपी हेअर केअर रेंजमध्ये क्टिव्हेटेड बांबू चारकोल शाम्पू अँड कंडिशनर, स्टिम्युलेट ऑइल (मिश्र तेल – केसांच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट), फ्लॅकी ऑइल (कोंड्यावर उपचारासाठीचे मिश्र तेल), हेअर रिव्हायटलाइज सेरम (केसांच्या वाढीस साह्यकारी) या तेलांचाही समावेश आहे. ही श्रेणी एसजीएस मॉलमधील ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक किऑस्क, आघाडीची ब्युटी कॉस्मेटिक स्टोअर्स व अरोमामॅजिक.कॉम (Aromamagic.com) संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यासंदर्भात माहिती देताना डॉ. ब्लॉझम कोच्चर म्हणाल्या, अरोमाथेरपी हेअरकेअर रेंजमधील आवश्यक तेलांच्या उत्तम गुणधर्मामुळे केसांच्या समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर समग्र दृष्टीकोनातून उपचार करण्यास मदत मिळते. या श्रेणीतील शाम्पू केसातील कोंड्यावर उपचारासाठी, केसगळती रोखण्यासाठी, केसांना चमक आणण्यासाठी, केसांचा पोत सुधारण्यासाठी, केसांचे पोषण राखण्यासाठी, मस्तिष्क तेलकट राहणे रोखण्यासाठी किंवा केस खूपच तेलकट बनणे रोखण्यासाठी साह्य करतात, तर टोनरमुळे मस्तिष्कावरील तेलाचे संतुलन साधले जाते. केस निगा राखण्यासाठी नैसर्गिक पर्याय मिळण्याच्या ग्राहकांच्या मागणीतून मला भारताची पहिली अरोमाथेरपी आधारित हेअर केअर सोल्यूशन्स निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

डॉ. ब्लॉझम कोच्चर या दूरदर्शी व्यक्तीमत्त्व आहेत. भारतात अरोमाथेरपी उपचारांच्या त्या प्रवर्तक असून त्यांच्या कार्यासाठी जगभर मान्यता मिळवलेल्या आहेत. त्या ब्लॉझम कोच्चर ग्रुप ऑफ कंपनीजच्या अध्यक्ष असून त्यांचे नाव ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक व ब्लॉझम कोच्चर कॉलेज ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स अँड डिझाईन (बीकेसीसीएडी) या यशस्वी ब्रँडशी जोडले गेले आहे.

‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’विषयी

‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’ हा भारतातील सर्वांत मोठा अरोमाथेरपी ब्रँड आहे. त्याची १७० हून अधिक अरोमाथेरपी-आधारित उत्पादने असून त्यात स्किन केअर, हेअर केअर, इसेन्शियल ऑइल्स व क्युरेटिव्ह ऑइल्सचा समावेश आहे. या जोरावर ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिकने सौंदर्यप्रसाधने उद्योगात विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. या विशाल श्रेणीत सुगंधोपचारनिष्ठ अशी स्किन, हेअर व वेलनेस उत्पादने आहेत, जी काळजीपूर्वक संशोधनानंतर विकसित केली असून मन, शरीर व आत्म्यावर सकारात्मक कल्याणकारी परिणाम होण्यासाठी त्यांचे मिश्रण करण्यात आले आहे.

प्रत्येक उत्पादन तयार करताना पारंपरिक पद्धती वापरण्यात आल्या असून त्यात अरोमाथेरपी शास्त्राचा समन्वयही साधला आहे, ज्यात वनस्पती, फुले व बियांपासून तेल काढले जाते. सर्व आवश्यक तेले काळजीपूर्वक मागवली जातात आणि डॉ. ब्लॉझम कोच्चर यांच्या नजरेखाली त्यांचे अचूक मिश्रण केले जाते.

डॉ. ब्लॉझम व त्यांचे पती कर्नल व्ही. कोच्चर (दिवंगत) यांनी एकत्रित ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिकची स्थापना वर्ष १९९३ मध्ये केली. आज त्यांची कन्या समंथा कोच्चर यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी दमदार विस्तारली असून भारतातील अरोमाथेरपी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी बनली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.