उद्धव ठाकरेंची अडचण; 28 मेपर्यंत आमदार होणे आ‌वश्यक

Date:

  • निवडणूक जाहीर झाली नाही तर पुन्हा घ्यावी लागेल शपथ 
  • येत्या 24 एप्रिलला विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत

मुंबई . लॉकडाऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले उद्धव हे सध्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत िवधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आ‌वश्यक आहे. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यानुसार त्यांना २८ मेपर्यंत आमदार होणे आ‌वश्यक आहे. मात्र कोरोनामुळे राजकीय हालचाली थंडावल्या आहेत. मार्चमधील प्रस्तावित ग्रामपंचायत निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

येत्या २४ एप्रिलला विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. त्या दृष्टीने ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य बनण्याची तयारी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप याची तारीख जाहीर केलेली नाही. आयोगाने याआधी राज्यसभेच्या निवडणुकाही स्थगित केल्या आहेत. याचीही तारीख नंतर घोषित होणार आहे. यामुळे अडचणीत भर पडली.

राज्याचे मुख्य सचिव अनंत कळसे यांनी सांगितले की, मेपर्यंत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत तर ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाला राजीनामा देऊन पुन्हा शपथ घ्यावी लागेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...