Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उद्धव ठाकरे हे एक अतिशय सज्जन गृहस्थ :राज्याच्या गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांना धोका दिला

Date:

एक वेळ भाजपा राष्ट्रवादीचे सरकार होईल पण सेना भाजपचे होणार नाही – विश्वंभर चौधरींचा कयास

पुणे – विधान परिषदेनंतर घडलेल्या राजकीय घटनांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे लक्ष वेधून घेतले असून यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक विश्वंभर चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे .

ते म्हणाले ,’ चाळीस गुवाहटीत पोचलेत. अजून दहा शिंदेंसोबत आहेत असा दावा आहे. तसं असेल तर सेनेकडे फक्त चार आमदार उरतात. आदित्य ठाकरे सोडून इतर तीन निष्ठावान कोण एवढाच उत्सुकतेचा मुद्दा आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री परागंदा होतात पण ते पोलिसांना कळत नाही हे बुद्धीला पटत नाही. गृहखातं स्वतःकडे न ठेवण्याचा फटका मुख्यमंत्र्यांना बसला आहे. हा कट एका दिवसात शिजला नसणार. मात्र सीआयडीला त्याची खबर नसावी हे आश्चर्य आहे. राज्याच्या गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांना धोका दिला असा याचा अर्थ आहे. गृहमंत्री गृहखातं चालवत असले तरी सगळं रिपोर्टींग मुख्यमंत्र्यांना मिळावं अशी व्यवस्था असते.’तुम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हा’ हा सल्ला उद्धवजींनी नाकारला असता आणि तेव्हाच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं तर प्रतिष्ठा गेली नसती. हा दिवस पहावा लागला नसता. बाकी जे घडलं त्याचं बरंच श्रेय संजय राऊतांना द्यायला पाहिजे. दररोज सकाळी नऊ वाजता चॅनलवर येऊन भाजपाच्या रोषाच्या संपूर्ण फोकस शिवसेनेवर राहील याची काळजी त्यांनी घेतली. राजकारणात परतीचे दोर कधीच कापायचे नसतात, ते दररोज सकाळी नऊ वाजता सपासप कापून राऊतांनी अप्रत्यक्षरित्या किंवा नकळत राष्ट्रवादीला सेफ पॅसेज दिला. संजय राऊतांचा उद्देश तो नक्कीच नसणार पण घडलं मात्र तेच. तिकडे स्वतःचे दोन मंत्री आत टाकले तरी राष्ट्रवादीनं संयत प्रतिक्रिया देत दोर पूर्णतः कधीच कापले नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की एकवेळ भाजप-राष्ट्रवादी सरकार होईल पण भाजप-सेना सरकार बनणार नाही. उद्धव ठाकरे हे एक अतिशय सज्जन गृहस्थ आहेत. कदाचित हा त्यांचा प्रांतच नव्हता किंवा आसपास सगळेच दगाबाज होते.असे विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.

फार मोठ्या कोंडीत सापडले आहेत. पक्ष, पक्षप्रमुखपद आणि धनुष्यबाण हे चिन्ह वाचवायचं असेल तर शिंदेंसोबत तडजोड करण्याला पर्याय दिसत नाही.राजकारणात असे पेच येतात ते काही तरी गमावून सोडवावे लागतात. शिवसेनाप्रमुखपद की मुख्यमंत्रीपद याचा निर्णय उद्धवजींना घ्यायचा आहे. ही अभूतपूर्व आणि तितकीच दुर्दैवी कोंडी आहे पण दुसरा पर्याय दिसत नाही.सेही विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...