Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उद्धव ठाकरे आणि अजित पवार म्हणाले,’आणीबाणी आहे काय ? मोर्चा काढणारच ..

Date:

अमित शहांचा सल्ला जूनाच, दिल्लीतून फक्त पोहे खाऊन यायचे का? – उद्धव ठाकरे

मुंबई-महाराष्ट्र – ज्या – ज्या वेळी सीमाप्रश्न चिघळला तो प्रत्येकवेळी कर्नाटकच्या बाजूने तो चिघळवण्यात आला आहे. महाराष्ट्कराच्या बाजूने नाही. कालच्या बैठकीत नवे काय घडले? असा सवाल करत कर्नाटक सीमावादावर अमित शहांनी नवीन सल्ला दिला नाही तो जूनाच आहे. सुप्रीम कोर्टात मुद्दा प्रलंबित असतानाही बेळगावला उपराजधानीचा दर्जा का दिला गेला. त्यानंतर तेथे विधानसभा अधिवेशन का? घेतले जाते. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत केवळ महाराष्ट्रानेच थांबायचे का? दिल्लीतून नुसते पोहे खाऊन यायचे का? असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना सुनावले. यासह त्यांनी सीएम एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

राज्यपालांच्या शिवरायांवरील वक्तव्यानंतर 17 डिसेंबरला राज्यव्यापी मोर्चा काढला जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीची एक बैठक राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या घरी बैठक झाली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषदही घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काॅंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शहांनी नवीन सल्ला दिला नाही. सुप्रीम कोर्टात मुद्दा प्रलंबित असतानाही बेळगावला उपराजधानीचा दर्जा का दिला गेला. त्यानंतर तेथे विधानसभा अधिवेशन का? घेतले जाते. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत केवळ महाराष्ट्रानेच थांबायचे का? दिल्लीतून नुसते पोहे खाऊन यायचे का? ज्या – ज्या वेळी सीमाप्रश्न चिघळला तो प्रत्येकवेळी कर्नाटकच्या बाजूने तो चिघळवण्यात आला आहे. मग कालच्या बैठकीत काय झाले

उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार महाराष्ट्राचे असूनही सरकार महाराष्ट्राची बाजू मांडत नाही. विरोधीपक्ष मांडतो आहे. महाराष्ट्रप्रेमी विरोधी पक्ष आहेच पण सत्ताधारी आहेत की नाही? ट्विट म्हणजे जखमेंवर मीठ चोळले. आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केवळ होयबा करून आले आहेत. वर्षानुवर्षे सीमाभागातील नागरिक महाराष्ट्रात यायचे म्हणतात त्यावर उत्तर द्या.

वाचा तर प्रथम ..

उद्धव ठाकरे म्हणाले, फॅक्चर फ्रिडम पुस्तकाला पुरस्कारावर मी म्हणेल की, एखादी समिती नेमली जाते त्या समितीचा आदर करायला हवा. पुस्तक न वाचता पुरस्कार कसा देऊ शकता आणि न वाचता तो परत कसा घेऊ शकता.

अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा निघणार आहे. आमच्या मोर्चात स्वंयसेवी संघटना सहभागी होणार आहे. जनतेलाही आवाहन आम्ही करतो की आमच्या मोर्चात सहभागी व्हावे. गत सहा महिण्यात राज्यात गलथान कारभार सुरू आहे. महापुरुषांच्या बाबतीत गरळ ओकण्याचे काम सुरू आहे. त्याला कुणी आवरही घालत नाही.

महागाई, बेरोजगारीवरही मोर्चा

अजित पवार म्हणाले, लोकांमध्ये असंतोष आहे. सीमाप्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज, शाहु फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये केली गेली अशांच्याविरोधात आमचा मोर्चा आहे. यासह महागाई, बेरोजगारीवरही आमचा मोर्चा आहे. अनेक राजकीय पक्ष सहभागी असून समंजस भूमिका सर्व सहभागी राजकीय पक्षांनी घेतली आहे.

सर्व परवानग्या मिळतील ..

अजित पवार यांनी सांगितले की, विद्धवंसक मोर्चा नाही. तो लोकशाही पद्धतीने आहे, आम्ही परवानग्या मागितल्या नाही पण आम्हाला त्या मिळतील असा विश्वास वाटतो. आम्हाला परवानग्या नाकारल्या गेल्या यात तथ्य नाही. लोकांनी उत्स्फुर्तपणे येतील. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आवाहन आहे की, मोर्चाचे विषय आम्ही सांगितले मोर्चा राजकीय पक्षांशी संबंधित नाही.

मुख्यमंत्र्याचे ट्विटर हॅॅक होते आणि २० दिवसांनी कळते काय ?

अजित पवार म्हणाले, अमित शहा, बसवराज बोम्मई आणि सीएम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीत कालच्या चर्चेतून काय झाले हे सर्वांनाच माहित आहे. बोम्मईंच्या ट्विटरमुळे महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद चिघळला का? यावर बोम्मईंनी याबाबत स्पष्ट नाही ते फेक अकाऊंट आहे असे सांगितले आहे. आज माझी उद्धव ठाकरेंसह अन्य जणांशी चर्चा झाली.

अजित पवार म्हणाले, कर्नाटकची बाजू सुप्रीम कोर्टात रोहीतगी मांडत आहेत. त्यावेळी प्रख्यात वकील हरीष साळवी यांचे नाव मी देवेंद्र फडणवीस यांना सुचवले आहे. सीमाभागातील लोकांच्या आग्रही मागण्यांचा विचार व्हावा असेही मी त्यांना सांगितले. अमित शहांनी दोघांनाही समंजस भूमिका घ्यायचे सांगितले. आम्ही पहिल्यापासून आणि उभ्या महाराष्ट्राची भूमिका आहे की, सीमाभाग आमचा आहे. आम्हाला त्यात राजकारण करायचे नाही. आमचा मोर्चा या एक मुद्द्यावर आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, कालच्या बैठकीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हॅक झाले होते का? ते फेक आहे का? ठिक आहे पण खुलासा का पंधरा दिवसांनंतर आला. पोलिस कारवाई ट्विटरवर नव्हे तर प्रत्यक्ष झाली. अटक आणि वाहनांची तोडफोड ही प्रत्यक्ष झाली. बोम्मईंनी आणि त्यांच्या सीएमओंनी जागरुक असायलाच हवे. दिल्लीत बैठक बोलवण्यापर्यंत बोम्मईंचा खुलासा का थांबला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...