Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खरे जातीयवादी राज ठाकरे: जितेंद्र आव्हाड

Date:

पुणे:मागील दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रात जातीयवाद पसरवला असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत प्रत्युत्तर दिले.पुण्यात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्यात भोंग्याचे राजकारण कुणी केले. राज ठाकरे यांनी, ते ज्या शरद पवारांवर जातीयवादाची टीका करतात त्यापेक्षा राज ठाकरे यांनीच खरा जातीयवाद पसरवला अशी टीकाही त्यांनी केली.

त्यामुळे झाले काय, राज्यातील काकड आरत्या बंद झाल्या. त्यामुळे ध्रुवीकरणही झाले असल्याचे म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे असल्याची टीकाही त्यांनी केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे यांनी कठोर भूमिका घेत भाजपसह त्यांनी राज्यपालांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची मुंडकी छाटून टाकावी वाटतात असंही त्यांनी वक्तव्य केले होते.

तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला म्हणून रायगडवर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितले होते. त्यावर मंत्री चंद्रकात पाटील यांनी उदयनराजे यांची छत्रपती उदयनराजे असा उल्लेख करत राज्यपालांनी चुकीचे बोलले असतील तर त्यांनी त्यांना माफ करावं आणि हा विषय मिठवावा अशी त्यांनी मागणी केली होती.

त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्राच्या बापाचा अपमान करणार आणि ते महाराष्ट्रानं विसरावं अशी तुम्ही का अपेक्षा करता असं सवालही त्यांनी चंद्रकांत पाटलांना केला आहे.

त्यामुळे उदयनराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा देताना ते म्हणाले की, उदयनराजे यांना संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी जर आंदोलन केले तर तो त्यांचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आव्हाड म्हणाले, ”राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कधीच जातिवाद केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. अशा महाराष्ट्रातील दैवताचा अपमान होत असताना महाराष्ट्र शांत कसा?. काही लोक महाराष्ट्राचे स्वास्थ्य बिघडविण्यासाठी सातत्याने छत्रपतींच्या चारित्र्यावर हल्ला करत आहेत. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. राहुल गांधी देशाला जोडण्यासाठी हजारो किलोमीटर पायी चालत आहेत. इतिहासातील ही सर्वात मोठी पदयात्रा आहे. काही लोक रथयात्रा करतात. मात्र त्याने माणूस जोडला जात नाही. इतिहास पुसला गेला की, भविष्य पुसट होते. म्हणून राहुल गांधी इतिहास सांगत आहेत.”भारतीय संविधानाने अधिकार दिला, तर काँग्रेसने देश उभा केला आहे. काँग्रेसची भूमिका सर्वसमावेशक आहे. द्वेषाने देश कधीच जोडला जाणार नाही. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. मतभेद विसरून विचारांची देवाण-घेवाण करणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. कोणाला संपविण्याचा विचार कधीच काँग्रेसने केला नाही. त्यामुळे काँग्रेसच देशाला एकसंध ठेवू शकतो. असे मत जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...