अपघातस्थळांचा शोध घेऊन तिथे ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

अपघातमुक्त महाराष्ट्रासाठी ‘नियम’आणि ‘संयम’महत्त्वाचा

मुंबई, दि. १८ : राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

रस्त्यांवरील नियम पाळताना किंवा रस्ते क्रॉस करताना ज्या सोयी-सुविधा असतात त्यात सहजता हवी, त्याकडे लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचे नाव येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.

संयमआणिनियमपाळले नाही तर यम येतो

रस्ते सुरक्षा हा जीवनशैलीचा भाग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, नियम आणि संयम या दोन्ही शब्दात यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. रस्ते फक्त माणसेच क्रॉस करत नाहीत तर प्राणीही करतात. त्यांचीही काळजी घ्यायला हवी.

नवीन तंत्रज्ञान, अधिक वेगाच्या गाड्या येत आहेत त्या दृष्टीने माहिती देणे आणि जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.  वाहन चालविण्याचे  प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना नियम आणि शिस्त याची माहिती हवी. तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील. वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे.

कार्यक्रमात प्रकाशित दिनदर्शिकेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा चित्र आणि स्लोगन तयार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना धन्यवाद देऊन मुख्यमंत्र्यांनी ते करत असलेल्या  जनजागृतीच्या कामाचा गौरव केला.

अपघात कमी करण्यासाठीप्रयत्न – अनिल परब

परिवहन मंत्री ॲड.अनिल परब म्हणाले, ‘सडक सुरक्षा- जीवन रक्षा’ हे यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य असून हे अभियान यावेळी पहिल्यांदाच 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी २०२१ पर्यत महिनाभरासाठी सुरू राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीवर आपण अथक प्रयत्नातून, नियमांचे पालन करत आणि परस्परांच्या सहकार्याने नियंत्रण मिळवू शकलो. तसेच प्रयत्न अपघात कमी करण्यासाठी देखील केले पाहिजेत. यावर्षी जवळपास २४ हजाराच्या आसपास अपघात झाले असून आधीच्यावर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्के कमी आली आहे, तर मृत्यूमध्ये १० टक्के कमी आली आहे. असे असले तरी अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी नाही. ते आणखी कमी करण्यासाठी विविध उपक्रमातून वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून जनजागृती करुन या वर्षभरात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही ॲड.परब यांनी केले.

नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – श्री. शेख

पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. वाहन चालन परवाने कामात विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही श्री.शेख यांनी केले.

पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व आणि गरज अधोरेखित केली. प्रास्ताविक मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी केले तर आभार परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मानले.

क्षणचित्रे…

  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रस्ते अपघात संख्येत घट होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात मुंबई शहर,मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश.
  • परिवहन विभाग,टाटा इनिशिएटीव व ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “टाटा स्ट्राईव्ह” वेब सिरीजचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
  • यावेळी मुख्यमंत्र्यांसहउपस्थितानी रस्ता सुरक्षा शपथ घेतली.
  • परिवहन विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे पिक्सलसेंट या रस्ता सुरक्षा लघुपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली.

यावेळी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा,  परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय  परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह परिवहन, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे  प्रतिनिधी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...