Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाजपला केंद्रातील नेते बोलविण्याची वेळ! -सचिन अहिर यांची टीका

Date:

पुणे-कसबा असो किंवा चिंचवड या दोन्ही ठिकाणी शिवसेना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे काम करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. आज जनमत, सर्व्हे हे भाजप विरोधात जात असल्यानेच त्यांच्यावर केंद्रातील नेते याठिकाणी प्रचाराला आणण्याची वेळ आली असल्याची टीका पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्त गुप्ते मंगल कार्यालयात आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सचिन अहिर बोलत होते. याप्रसंगी महिला आघाडीच्या संपर्क संघटिका तृष्णा विश्वासराव, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, पृथ्वीराज सुतार, समीर तुपे, गजानन पंडित, आनंद गोयल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, बाळासाहेब मालुसरे, रामभाऊ पारीख, युवासेनेचे राम थरकुडे, सनी गवते, काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सचिन अहिर म्हणाले, ‘ही निवडणूक महाविकास आघाडी या नात्याने आपल्याला जिंकायची आहे. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता कसबा मतदारसंघात बदल शक्य आहे. महाविकास आघाडी म्हणून धंगेकर यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ही आघाडी केवळ विधानसभेपुरती नाही. ही निवडणूक अटीतटीची असून, आपल्याला प्रत्येक बूथमध्ये काम करून विजय निश्चित करायचा आहे.’

तृष्णा विश्वासराव म्हणाल्या, ‘कसबा मतदारसंघात आपला महाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे. यासाठी सर्व शिवसैनिक प्रयत्न करतील. येत्या पालिका निवडणुकीत आपले शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून येतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी रवींद्र धंगेकर, संजय मोरे, विशाल धनवडे, ज्येष्ठ शिवसैनिक विजय ठकार यांचीही भाषणे झाली.

डॉ. बाबा आढाव यांची धंगेकर यांनी भेट घेऊन घेतले आशीर्वाद

रवींद्र धंगेकर यांनी आज ज्येष्ठ नेते व समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची घरी जाऊन सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस वीरेंद्र किराड आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे होते. सध्या परीस्थित रवींद्र धंगेकर निवडून येणे गरजेचे आहे. त्यांना सर्व स्तरातून पाठींबा आहे, आमचाही पाठिंबा आहे. अनेक नागरी प्रश्न आहेत की जे धंगेकर सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे. असे या प्रसंगी बाबा आढाव म्हणाले. त्यांनी यावेळी मतदार संघातील अनेक प्रश्नांचा उल्लेख केला. ‘या प्रत्येक प्रश्न लक्ष घालून ते सोडवण्याचा मी प्रयत्न नक्की करेन’ अशी खात्री रवींद्र धंगेकर यांनी यावेळी त्यांना दिली. याप्रसंगी हमाल पंचायतचे सरचिटणीस गोरख मेंगडे, उपाध्यक्ष दत्तात्रय डोंबाळे, व्यवस्थापक हुसेन पठाण, सहचिटणीस विनोद शिंदे, संघटक संदीप मारणे, रिक्षा पंचायतीचे व्यवस्थापक रांजणे, राहुल नागावकर, टेम्पो पंचायतीचे सरचिटणीस संपत सुकाळे, पथारी व्यावसायिक पंचायतीचे सरचिटणीस मोहन चिंचकर, महिला अध्यक्षा नीलम अय्यर, महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मोहन वाडेकर,  सहसचिव ओंकार मोरे आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...