आजपर्यंत भाजपाने नागरिकांची फसवूणकच केली- आमदार संग्राम थोपटे

Date:

श्री तांबडी जोगेश्वरी देवीची ओटी भरुन प्रचाराचा शुभारंभ !

पुणे :  आजपर्यंत भाजपाने नागरिकांची फसवूणकच केली आहे. आता त्यांच्या फसवणूकीला नागरिक बळी पडणार नाही असे प्रतिपादन कॉंग्रेस पक्षाचे आमदार व निरीक्षिक संग्राम थोपटे यांनी येथे केले.महाविकास आघाडीचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, समविचारी पक्ष-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र हेमराज धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी देवीला खण, नारळाची ओटी भरुन गुरुवारी करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे निरीक्षक व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रशांत जगताप, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे  आणि गजानन थरकुडे,  माजी आमदार उल्हासदादा पवार, माजी राज्य मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार रमेश बागवे, माजी आमदार महादेव बाबर, माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, काँग्रेसचे डॉ.रोहित टिळक, माजी महापौर कमल व्यवहारे व रजनी त्रिभुवन,  माजी उपमहापौर आबा बागुल व दीपक मानकर,  लता राजगुरू, रफीक शेख, पल्लवी जावळे, दत्ता सागरे,  संजय बालगुडे, विरेंद्र किराड, प्रशांत बधे, प्रवीण करपे, गणेश नलवडे, संदीप गायकवाड, बाळासाहेब मारणे, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व  कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी थोपटे म्हणाले की, महाविकास आघाडीचा मोठा पाठींबा व नागरिकांचा प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना आहे. त्यामुळे आमची विजयाची घौडदौड सुरु झाली आहे. नागरिकांचे मत विकास करणार्‍या महाविकास आघाडीलाच असणार असल्यामुळे धंगेकर यांचा विजय निश्चित आहे.महाविकास आघाडीचा विजय निश्तिच आहे. नागरिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या नाकर्तेपणाला नागरिक कंटाळले आहेत. 

कसब्यामध्ये परिवर्तनाचे वारे

नागरिकांना आता मतदारसंघाचा विकास हवा आहे. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने बरोबर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित होणार आहे. कसब्यामध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असून निकालाच्या दिवशी याची प्रचीती येईल असे, रविंद्र धंगेकर म्हणाले. कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावणारी ही पदयात्रा केसरीवाडा येथे पूर्ण झाली.

 धंगेकर यांच्या प्रचाराला गुरुवारी ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. यावेळी ग्रामदेवता  जोगेश्वरी देवीला खण-नारळाची ओटी भरुन रविंद्र धंगेकर यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी जमलेल्या महिलांनी धंगेकर यांचे औक्षण केले. “विजय कोणाचा महाविकास आघाडीचा”,” कसब्यात आवाज कोणाचा महाविकास आघाडीचा”, “आला रे आला पंजा आला” या घोषणा दिल्या गेल्या . फटाक्याची आतषबाजी…बँडपथकाच्या निनाद अशा वातावरणात तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून सुरु झालेल्या फेरीमध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद  दिला.पुढे मेहुणपुरा येथील सोसायट्यामध्ये महिलांनी रविंद्र धंगेकर यांचे औक्षण केले. अप्पा बळवंत चौक,  मेहुणपुरा रस्ता, अहिल्याबाई चौक, शिंदेपार चौकासह ठिकठिकाणी रविंद्र धंगेकर यांचे स्वागत व महिलांनी औक्षण व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले.  प्रत्येकाच्या हातात  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच समविचारी संघटनेचे व सर्व आघाडीचे ध्वज हाती होते.

अहिल्याबाई होळकर चौक, गणेश मंडळ,  श्री मारुती शनी मंदिर,  शनिवारपेठ मेहूनपुरा गणेश मंडळा च्या श्रीचें दर्शन घेतले. तसेच मंडळीने स्वागत केले. प्रचार फेरी श्री तांबडी जोगेश्वरी पासून अप्पा बळवंत चौक मार्गे मेहुणपुरा- शनिवार पेठ,  अहिल्याबाई होळकर चौक, रामशास्त्री प्रभुणे चौक, शिंदेपार चौक, रमणबाग चौक ते केसरीवाडा येथे फेरीचा समारोप झाला. प्रसंगी मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती व लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.