प्रवरानगर -सहकार मोडीत निघाले असे सांगणारे सहकारी कारखाने विकत घेतायेत , सहकारी कारखाने नेत्यांच्या घशात गेले आहेत अशी टीका आज येथे माजी मुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकार परिषदेत बोलताना केली
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकार चळवळीवरून महाविकास आघाडीचे नाव न घेता टीका केली आहे. देशात नरेंद्र मोदींचे आणि महाराष्ट्रात आमचे सरकार आले, तेव्हा लोक म्हणायचे की यांना सहकारमधले काय कळते? आता सहकारचे काय होणार? पण आमच्या सरकराने सहकारबाबत घेतलेले निर्णय सहकारला अडचणीतून बाहेर काढणारे ठरले, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला जगविण्याचे काम केले असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. MSP लावल्याने खऱ्या अर्थाने सारख कारखाने तरले. यामुळे शेतकऱ्यांचे भले झाले आहे. केंद्राने इथेनॉलचे धोरण केल्यामुळे साखर कारखान्यांचे दिवस पालटले आहेत. असेही फडणवीस म्हणाले.
शहा चळवळीतून तयार झालेले नेते आहेत. अमित शहांचे मूळ हे सहकार आहे, सहकाराच्या मुळाची जाणीव असल्यानेच अमित शहांची या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून निवड झाल्याचे फडणवीस म्हणाले. शहा यांनी पहिला निर्णय साखर कारखान्यांना आयकर विभागाच्या जाचातून बाहेर काढण्याचा घेतल्याचे त्यांनी सांगितले

