Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ठाकरे सरकार टक्केवारी अन् वसुलीत खूश-फडणवीसांचा हल्लाबोल

Date:

जालना – ठाकरे सरकार हे टक्केवारी आणि वसुलीत खूश आहे. जनतेच्या प्रश्नाचे सरकारला देणे घेणे नाही. मराठवाड्याची कवचकुंडले या सरकारने मारून टाकली. जनतेच्या समस्या सोडवणार नसाल, तर तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला. जालना भाजपाच्या वतीने आयोजित जलआक्रोश मोर्चात ते बोलत होते.

यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
– 129 कोटी रुपये जालन्याच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी आमच्या सरकारने दिले. पण काम ठप्प! महाविकास सरकार एकच काम करते, आमच्या सरकारच्या काळात आणलेल्या योजनांना स्थगिती आणि स्थगिती न दिलेल्या उर्वरित योजना/कामांचे उदघाटन.
– मराठवाड्यातील एकाही शहराला पाण्याच्या अडचणी येऊ नये, म्हणून आम्ही वॉटरग्रीडची योजना तयार केली. पण, महाविकास आघाडी सरकारने योजनेला निधी देणेच बंद करून टाकले. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या योजनेचा या सरकारने मुडदा पाडला.
– जलयुक्त शिवार, शेततळे अशा सार्‍या योजना बंद केल्या.
सूक्ष्मसिंचनाच्या योजनांचा खून केला.
वैधानिक विकास मंडळ बंद करून टाकले.
हे सरकार पाण्याचे शत्रू आहे.
– ते सत्तेत खुश आहेत.
ते मालपाणी कमाविण्यात खुश आहेत.

ते टक्केवारीत खुश आहेत.
ते वसुलीत खुश आहेत.
जनतेच्या दु:खाशी त्यांना काहीच लेनदेन नाही,
सत्ता टिकविणे, हेच त्यांचे एकमेव ध्येय आहे.
– जेथे जेथे जनतेसाठी संघर्ष,
तेथे तेथे भारतीय जनता पार्टी.

या राज्यात सरकार आहेच कुठे?
मुख्यमंत्री कार चालवितात
आणि भगवान सरकार चालविते


फडणीस म्हणाले की, मुख्यमंत्री कार चालवतात. सरकार भगवान चालवते. राज्यातले सरकार राम भरोसे आहे. या सरकारला जागे करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. सरकारने जालन्याला एक रुपयाही दिला नाही. हे सरकार पाणीप्रश्नासाठी सरकार गंभीर नाही. या सरकारने पाणी योजनांची हत्या केली, असा आरोपही त्यांनी केला. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती जालन्यात आहे. पैठणच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असताना जालन्यात 15-15 दिवस पाणी येत नाही. सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, मविआ सरकारमुळे अनेक कामे रखडली आहेत. पाणीप्रश्नासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही. आमच्या सरकारने 129 कोटी रुपये पाणी योजनेसाठी पैसै दिले. मात्र अडीच वर्षांत ही योजना पुढे गेली नाही. हे सरकार केवळ चालू कामे बंद करण्याचे काम करते आहे. 157 टीएमसी पाणी समुद्रात जाऊ न देता ते गोदावरी खोऱ्यात आणण्याचा प्रयत्न मविआ सरकारने हाणून पाडला. जलयुक्त शिवार योजना ठाकरे सरकारने बंद केली. हे सरकार सगळ्या योजना बंद करते आहे. वैधानिक विकास महामंडळ बंद केले आणि मराठवाड्यावर अन्याय केला. मात्र मंत्र्यांनी ब्र शब्द काढला नाही. मराठवाड्यातील मंत्रीही केवळ पैसा कमविण्यात व्यस्त आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस म्हणाले, जनतेच्या प्रश्नाचे ठाकरे सरकारला काही देणे घेणे नाही. त्यांना गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी सिंहासन दिले आहे. मात्र, त्यांच्याकडून जनतेसाठी काही काम झाले नाही. 35 हजार कोटी मोदी सरकारने पाणी समस्या सोडविण्यासाठी दिले. मात्र, राज्य सरकारकडून 500 कोटी रुपये देखील खर्च होऊ शकले नाहीत. जालन्याला रोज पाणी मिळणार नाही, तो पर्यंत ठाकरे सरकारला आम्ही झोपू देणार नाही. सरकारमुळे मराठवाड्यातील जनतेच्या पाणी योजना रखडल्याचा आरोपही त्यांनी केला.

फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वात जालन्यात भाजपचा जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला पाणी प्रश्नावरून चांगलेच घेरले. दानवे म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना जालना नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. तरीही फडणवीस यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शहराच्या विकासासाठी उपलब्ध निधी उपलब्ध करून दिला. यात अंतर्गत जलवाहिनीसाठी प्रमुख्याने 125 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मात्र, शहरात पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्याशिवाय स्वच्छता, रस्ते, पथदिवे या संदर्भातील प्रश्नही ज्वलंत आहेत. त्यामुळेच या नागरी प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा असल्याचे दानवे यांनी सांगितले.

दानवे म्हणाले, अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारने राज्याला किाय दिले सांगावे? त्यांना जालन्यातील मोर्चाची दखल घ्यावीच लागेल. येणारा काळ नक्कीच परिवर्तनाचा असेल, असा दावा त्यांनी केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, यापूर्वी औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून शहरातील पैठणगेट ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत ‘जल आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...