महावितरणचे अस्तित्व टिकवणे ग्राहक-कर्मचाऱ्यांच्या हातात

Date:

मुंबई : दिनांक ०६ जून २०२२;- ‘महावितरण हे देश पातळीवर अनेक राज्यांच्या तुलनेत सक्षमच आहे. ग्राहकांनी घेतलेल्या सेवेचे मुल्य दिले पाहिजे तरच कोणताही व्यवसाय टिकू शकतो. सरकारी कंपन्याही यास अपवाद नाहीत. मात्र दुर्दैवाने भारतीय समाजास जात धर्म, प्रदेश आदी बाबी कळतात मात्र ऊर्जा क्षेत्राचे महत्व कळत नाही. त्यामुळेच महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत कंपनीचे खाजगीकरण टाळायचे असेल तर महावितरणमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेत वाढ केली पाहिजे तसेच वीज बिलाची वसूली केली पाहिजे. ग्राहकांनीही वेळेत बिल भरले पाहिजे. अन्यथा महावितरणचे खाजगीकरण टाळणे अशक्य आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

            महावितरणच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड येथील सभागृहात आयोजित ‘विद्युत क्षेत्रातील सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल होते. याप्रसंगी संचालक(वित्त) रवींद्र सावंत, संचालक(संचालन) संजय ताकसांडे, संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक(वाणिज्य) डॉ.मुरहरी केळे व संचालक (मानव संसाधन) डॉ.नरेश गीते यांची प्रमुख उपस्थिती होती.

            कुबेर पुढे म्हणाले, ‘जगातिक स्तरावर कोणत्याही देशाची विकासाची दिशा व वेग हे ऊर्जा क्षेत्र घडवत असते. नागरिकांना मागेल तेवढी ऊर्जा उपलब्ध असली पाहिजे, हेच प्रगतीचे लक्षण आहे. भविष्यातील विजेच्या गरजेचे नियोजन करताना मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. राज्याच्या बाबतीत विचार करता लोकांनी बिले न भरल्यास व भूमिका न घेतल्यास लोकांच्या मालकीची असलेली कोणतीच सरकारी कंपनी अस्तित्वात राहणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कठोर भूमिका घेऊन वसुली केली पाहिजे, याला कोणताच दुसरा पर्याय नाही. राजकीय भूमिकेतून ग्राहकांकडून वीजबिल वसुलीस विरोध असल्यास सरकारने आपल्या निधीतून महावितरणला पैसे उपलब्ध करून द्यावेत.’

            अध्यक्षीय भाषणात विजय सिंघल म्हणाले, ‘कोरोना काळात आणि त्या नंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मात्र आपल्या समोरील आव्हाने अजून संपली नाहीत. अजून व्यावसाईक पद्धतीने काम करावे लागेल. थकीत वीजबिल वसूल करणे, वीजहानी कमी करणे आदी बाबींवर काम करावे लागेल. क्षेत्रीय स्तरावर कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याने अजून प्रयत्न वाढवल्यास हे कामही अवघड नाही.’

            या कार्यक्रमास प्रकाशगड येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली उपस्थिती लावली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली निमजे यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी मानले. तत्पूर्वी वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड इमारतीच्या परिसरात मानवी शृंखला करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...