राज्यसभेने आज भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2020 मंजूर केले

Date:

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2020


राज्यसभेने आज नवी दिल्लीत भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2020 मंजूर केले.  2014 चा भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदा आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) कायदा 2017 हे देशाला भेडसावणाऱ्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ज्ञान देण्यासाठी केंद्र  सरकारचे विशिष्ट  उपक्रम आहेत. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदे (दुरुस्ती) विधेयक, 20 मार्च 2020.रोजी लोकसभेत मंजूर झाले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली , ज्यांच्या नेतृत्वात भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदे (संशोधन) विधेयक, 2020 आज राज्यसभेत मंजूर झाले. हे विधेयक मंजूर करण्यात दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सदस्यांचे आभार मानले. पोखरियाल म्हणाले की, विधेयक आयआयआयटींना त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार पद्धतींद्वारे देशातील माहिती आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासाला प्रोत्साहित करण्यास  चालना देईल.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कायदे (दुरुस्ती) विधेयक 2020 मंजूर झाल्यामुळे 2014 आणि  2017 मधील मुख्य कायद्यांमध्ये सुधारणा होईल. हे विधेयक सूरत, भोपाळ, भागलपूर, आगरतला आणि रायचूर येथील सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीत 5 आयआयआयटी राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून घोषित करेल. आयआयआयटी (पीपीपी) कायदा 2017 अन्वये विद्यमान 15 आयआयआयटीसह  त्यांना वैधानिक दर्जा दिला जाईल असे ते म्हणाले. 

पोखरियाल पुढे म्हणाले की आयआयआयटी कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2020 राष्ट्रीय महत्त्व असलेले विद्यापीठ किंवा संस्था द्वारा जारी केल्याप्रमाणे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (http://B.Tech) किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (http://M.Tech) किंवा पीएचडी पदवी या नावांचा वापर करण्याचे संस्थांना अधिकार देईल. या विधेयकामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशात मजबूत संशोधन पाया विकसित करण्यासाठी पुरेशा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संस्था सक्षम होतील.

पार्श्वभूमी:

  1. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात  उच्च शिक्षण आणि संशोधनाला  प्रोत्साहन देण्याची आयआयआयटीं मागील संकल्पना  
  2. केंद्रीय मंत्रिमंडळाने 26.11.2010 रोजी मंजूर केलेल्या सार्वजनिक-खासगी भागीदारी  (आयआयआयटी पीपीपी) मध्ये 20 नवीन आयआयआयटी स्थापन करण्याच्या योजनेंतर्गत आयआयआयटी (पीपीपी) कायदा  2017अंतर्गत 15 आयआयआयटी आधीपासून समाविष्ट आहेत. 

अंमलबजावणीची रणनीती आणि उद्दिष्टे 

सध्याच्या प्रस्तावाचे उद्दीष्ट सूरत, भोपाळ, भागलपूर, अगरतला आणि रायचूर येथे आयआयआयटीचे औपचारिकरण करणे आहे. हे आयआयआयटी यापूर्वीच  सोसायटी नोंदणी कायदा 1860.च्या अंतर्गत नोंदणीकृत संस्था म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांना आयआयआयटी (पीपीपी) 2017, कायद्यांतर्गत समाविष्ट केले जाईल.

मोठा प्रभाव

हा कायदा उर्वरित 5 आयआयआयटी-पीपीपी तसेच सार्वजनिक खासगी भागीदारी मोडमधील विद्यमान 15 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था’ घोषित करेल आणि त्यांना पदवी प्रदान करण्याचे अधिकार देईल. त्यांना बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (एम.टेक) किंवा विद्यापीठ किंवा राष्ट्रीय महत्त्व संस्थेने जारी केलेल्या पीएच.डी पदवी नावाचा वापर करता येईल. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मजबूत संशोधन पाया  विकसित करण्यासाठी पुरेशा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संस्था सक्षम करेल.

लाभार्थी संख्या 

संपूर्ण तांत्रिक मनुष्यबळासाठी उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख गरजा संस्थेच्या प्रशिक्षित कर्मचार्यांच्या कौशल्यातून पूर्ण केल्या जाण्याची अपेक्षा आहे.

राज्ये / जिल्हा समाविष्ट

राज्ये: गुजरात (सूरत), मध्य प्रदेश (भोपाळ), बिहार (भागलपूर), त्रिपुरा (अगरतला), कर्नाटक (रायचूर).

प्रत्येक संस्था लिंग, जाती, पंथ, अपंगत्व, अधिवास, वंश, सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी याकडे लक्ष न देता  सर्वांसाठी खुली असेल

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...

राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात

पुणे दि. २०: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय...