Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बुद्धांच्या विचारातच शांततामय जीवनाची ताकद- ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा 

Date:

पुणे,दि.१६:“शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी ध्यान साधना अत्यंत महत्वाची आहे. बुद्धांचे विचारच शांततामय जीवनाची ताकद आहे. वर्तमान काळात वाढत जाणार्‍या हत्या आणि आत्महत्या यांतील मधला मार्ग शांतीचा आहे. त्यासाठी बुद्धांच्या ज्ञान मार्गावर चालून जीवन समृद्ध करता येते.” असे उद्गार  ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. प्रसाद खांडेकर, कवि डॉ. संजय उपाध्ये, पीस स्टडीचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव व प्रा. विक्रांत गायकवाड उपस्थित होते.
प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले,“बौध्द धर्माच्या उदात आठ पट मार्गाचे प्रतिनिधित्व करतात. बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश देऊन अहिंसा व करूणा सारखी शिकवण दिली. बौध्द धर्माचा अवलंब करणे म्हणजे शांतता, एकता आणि अहिंसा होय. जगाला सत्य, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत बुद्धांचे पंचशील तत्व मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भगवान गौतम बुद्धांचे पंचशिल तत्व आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हेच संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकेल. बुद्धांनी विश्वधर्म, मानवकल्याण आणि जातिभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचे महत्कार्य केले आहे. तसेच, विश्व कल्याणाचा खरा ग्रंथ भगवद्गीता आहे. कसे जगावे आणि कसे जगू नये, जीवनाचा उद्देश काय, आपले कर्तव्य काय आहे हे त्यात नमूद आहे. जीवन सुखमय होण्याचे सूत्र म्हणजे त्याग आणि समर्पण आहे. संपूर्ण जगात भारताची ओळख भगवान बुद्ध् आणि महात्मा गांधी यांच्या नावाने आहे.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,“ बुद्धांचे विचार हे जीवनाला प्रेरणा देणारे आहेत. त्याच आधारावर डॉ. विश्वनाथ कराड यांनी रामेश्वर रूई येथे बुद्ध स्तूपाची निर्मिती करून समाज एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे. नेपाळ येथे झालेल्या भूकंपानंतर नागरिकांसाठी शेकडो घरांची निर्मिती केली. शांतता नांदावी यासाठी जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती डोमची निर्मिती करून अविरतपणे  शांती स्थापनेचे कार्य ते करीत आहेत. आजच्या काळात सायन्स इन सायलेन्स ही संकल्पना खूप गरजेची आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ गौतम बुद्धांबरोबरच महापुरूषांचे विचार भारताबाहेर पोहचविण्यासाठी सर्वांना समोर यावे लागेल. नकारात्मतेची भावना काढून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रत्येक कार्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. ”
त्यानंतर प्रा. विक्रांत गायकवाड, मिनाक्षी आर्या, डॉ. मिलिंद पात्रे यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार मांडून त्यातून बोध घेण्यास सांगितले.
डॉ. आर.एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक मांडले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...