विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठी-मंत्री सुधीर मुनगंटीवार

Date:

ओंकारेश्वराच्या दर्शनाने महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ

पुणे दि. ९ : विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला आहे, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठीआहे. हेमंत रासने यांचा लढा सत्य आणि विकासासाठी आहे.जनतेच्या सेवेच्या संकल्पनेतून काम करणार्‍या भाजपला विजयी करा असे प्रतिपादन येथे राज्याचे वनमंत्रीसुधीर मुनगंटीवार यांनी केले.

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ओमकारेश्‍वर मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आला झाला. त्यानंतर शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ या परिसरात पदयात्रा काढण्यात आली.

निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ, शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष भरत लगड, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, चिटणीस धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, प्रदेश प्रवक्ता कुणाल टिळक, गौरव बापट, शहर भाजप सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, माजी नगरसेवक गायत्री खडके, अजय खेडेकर, योगेश समेळ, आरती कोंढरे, कसबा भाजपचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस छगन बुलाखे, राणी सोनावणे, राजेंद्र काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले कि,’१९७८ सालापासून एखाद-दुसरा अपवाद वगळला तर कसबा मतदारसंघातील मतदारांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे.सत्य, धर्म, देश, विकासासाठी काम करणार्‍या विचारांचा विजय झाला आहे.
विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला आहे, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठी आहे.हेमंत रासने यांचा लढा सत्य आणि विकासासाठी आहे.केंद्र आणि राज्यात भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार आहे.कसब्यातील मतदारांना आवाहन आहे जनतेच्या सेवेच्या संकल्पनेतून काम करणार्‍या भाजपला विजयी करा.

पुणे देशातील सर्वोत्तम शहर करण्याचे स्वप्न साकार करू -रासने
हेमंत रासने यावेळी म्हणाले,’आजपासून आमचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा शुभारंभ आम्ही करत आहोत.हा शुभारंभ विक्रमी विजयाकडे घेऊन जाणारा आहे.कसबा विधानसभा निवडणुकीत विजय १०० टक्के निश्‍चितआम्हाला कधीच कोणाची भीती वाटत नाही.जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे हजारो कार्यकर्ते त्याबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही घर आणि घर पिंजून काढणार आहोत.आम्ही केलेल्या विकासाचा अजेंडा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशात, राज्यात आणि शहरात विकास करीत आहोत.पुढील ५० वर्षांतील पुणे शहर हे देशातील सर्वोत्तम शहर करण्याचे देवेंद्रजींचे स्वप्न आहे. या स्वप्नाला पुणेकरांची साथ आहे आणि आम्ही ते पूर्ण करू हा मला विश्‍वास आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पावरच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे जिल्ह्यातील १७ नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.