हज 2022 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज 1 नोव्हेंबरपासून सुरू , अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022

Date:

मुंबई- – हज 2022 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज 1 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे . केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री  मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत हज हाऊस  येथे ही घोषणा केली.  महत्त्वपूर्ण सुधारणा आणि वाढीव  सुविधांसह हज 2022 चे आयोजन केले जात आहे.

यात्रेची घोषणा करताना नक्वी म्हणाले, “संपूर्ण हज प्रक्रिया 100 टक्के ऑनलाइन असेल.हजसाठी ऑनलाइन आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज “हज मोबाईल अॅप” द्वारे लोकांना अर्ज करता येतील. हज 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.   “हज ऍप इन युवर हँड” या टॅगलाइनसह  “हज मोबाईल ऍप” अद्ययावत  करण्यात आले आहे. अॅपमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये आहेत ज्यात वारंवार विचारले जाणारे प्रश्न, अर्ज भरण्यासाठी माहिती, अर्जदारांना अतिशय सोप्या पद्धतीने अर्ज भरण्याची माहिती देणारे व्हिडिओ  यांचा यात समावेश आहे. “

“वोकल फॉर लोकल”

यावेळी भारतीय हज यात्रेकरू “वोकल फॉर लोकल” चा प्रचार करतील आणि हज यात्रेकरू स्वदेशी उत्पादने घेऊन हजला जातील. यापूर्वी हज यात्रेकरूना  सौदी अरेबियात चादरी-उशा-टॉवेल, छत्री आणि इतर वस्तू विदेशी चलनात खरेदी कराव्या लागत होत्या. यावेळी, यातील बहुतांश स्वदेशी वस्तू भारतीय चलनात भारतात खरेदी केल्या जातील. सौदी अरेबियाच्या तुलनेत या वस्तू भारतात सुमारे 50 टक्के कमी किमतीत उपलब्ध असतील, तसेच त्यामुळे  “स्वदेशी” आणि “वोकल फॉर लोकल” ला देखील प्रोत्साहन मिळेल.  या सर्व वस्तू हज यात्रेकरूंना भारतातून यात्रेला रवाना होण्याच्या ठिकाणी  दिल्या जातील.

नक्वी  म्हणाले की, अनेक दशकांपासून हज यात्रेकरू या सर्व वस्तू सौदी अरेबियात परदेशी चलनात खरेदी करत असत. विशेष म्हणजे यातील बहुतांश वस्तू ‘मेड इन इंडिया’ होत्या, ज्या विविध कंपन्या भारतातून विकत घ्यायच्या आणि हज यात्रेकरूंना सौदी अरेबियामध्ये दुप्पट किंवा तिप्पट किमतीत विकायच्या.

एका अंदाजानुसार या व्यवस्थेमुळे भारतीय हज यात्रेकरूंच्या  कोट्यवधी रुपयांची बचत होईल. भारतातून  दरवर्षी 2  लाख हज यात्रेकरू जातात.

संपूर्ण कोविड -19 लसीकरण निकषाच्या आधारे  हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया

नक्वी म्हणाले की, हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया लसींच्या दोन्ही मात्रांसह पूर्ण लसीकरण तसेच भारत आणि सौदी अरेबिया सरकारद्वारे ठरवण्यात येणारी मार्गदर्शक तत्त्वे आणि निकष आणि हज 2022 च्या वेळचे कोविड-19 प्रोटोकॉल लक्षात घेऊन केली जाईल.

संपूर्ण हज 2022 प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे आणि महामारीच्या आव्हानांचा विचार करून अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियामधील भारतीय दूतावास आणि जेद्दामधील भारताचे कौन्सुल जनरल आणि इतर संस्थांमधील चर्चेनंतर तयार करण्यात आली  आहे.

हज 2022 साठी रवाना होण्याची 10 ठिकाणे

  1. हज 2022 साठी निघण्याची  ठिकाणे 21 वरून 10 करण्यात आली  आहेत. हज 2022 साठी, 10 प्रवास ठिकाणे – दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू,  लखनौ, कोचीन, गुवाहाटी आणि श्रीनगर.
  2. दिल्ली या ठिकाणी दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंडीगढ, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या  पश्चिमी जिल्ह्यांमधील यात्रेकरू जमतील.
  3. मुंबईत महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली इथले यात्रेकरू असतील.
  4. कोलकातामध्ये प. बंगाल, ओदिशा, त्रिपुरा, झारखंड आणि बिहार इथले यात्रेकरू असतील.
  5. अहमदाबादमध्ये संपूर्ण गुजरातमधील यात्रेकरू जमतील.
  6. बंगळुरू मध्ये  संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील यात्रेकरू येतील.
  7. हैद्राबादमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मधील यात्रेकरू असतील.
  8. लखनौमध्ये उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग वगळता संपूर्ण प्रदेश
  9. कोचीन मध्ये केरळ, लक्षद्वीप, पुडुचेरी, तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार मधील यात्रेकरू असतील.
  10. गुवाहाटीमध्ये आसाम, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि नागालॅंड  मधील यात्रेकरू
  11. श्रीनगरमध्ये जम्मू -काश्मीर , लेह-लडाख-कारगिल मधील यात्रेकरू

सर्व यात्रेकरूंसाठी “ई-मसिहा”

नक्वी म्हणाले की डिजिटल आरोग्य  कार्ड – “ई-मसिहा” , आरोग्य सुविधा आणि “ई-लगेज प्री-टॅगिंग”, मक्का-मदीनामधील निवास/वाहतूक यासंबंधी सर्व माहिती सर्व हज यात्रेकरूंना पुरवली जाईल.

नक्वी म्हणाले की, 3000 हून अधिक महिलांनी “मेहरम” (पुरुष सोबती) विना श्रेणी अंतर्गत   2020 आणि 2021 हजसाठी  अर्ज केले होते. जर त्यांना हज 2022 ला जायचे असेल तर त्यांचे अर्ज देखील हज 2022 साठी पात्र असतील. इतर महिला देखील “मेहरम” शिवाय अंतर्गत हज 2022 साठी अर्ज करू शकतात. “मेहरम” नको असलेल्या सर्व महिलांना लॉटरी प्रणालीतून सूट दिली जाईल.मुंबईतील सौदी अरेबियाचे रॉयल व्हाईस कॉन्सुल जनरल  मोहम्मद अब्दुल करीम अल-एनाझी, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव  निगार फातिमा;  भारतीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद याकूब शेख आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...