पोलिस आणि पालिकेने एकत्रित काम करण्याची गरज : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

Date:

  • समर्थ पोलिस स्टेशनमध्ये उभारण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेरे आणि कंट्रोल रूमचे उद्घाटन

पुणे – नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पुणे शहर अधिक सुंदर होण्यासाठी पोलिस विभाग आणि महानगरपालिका यांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि कंट्रोल रूम याचे उत्तम उदाहरण आहे. यापुढील काळात अशाच पद्धतीचे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी व्यक्त केली.
महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या विकासनिधीतून समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून अद्यावत कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे. याचे उद्घाटन पोलिस आयुक्त गुप्ता यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बिडकर महापालिका आयुक्त विक्रमकुमार, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू ताम्हाणे यांच्यासह पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. गृह विभागामार्फत संपूर्ण शहरात एक हजारापेक्षा अधिक कॅमेरे बसविण्यात आलेले असून अजून १४०० कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले प्रकल्प करताना निधीची अडचण येते महापालिकेने यासाठी निधी दिल्यास नागरिकांच्या हिताचे अनेक प्रकल्प मार्गी लागतील. पुणे पोलिसांनी ई व्हेईकलसाठीचा प्रस्ताव महापालिकेला दिला असून पुढील काही दिवसांमध्ये हा प्रकल्प देखील कार्यान्वित होईल, असा विश्वास पोलिस आयुक्त गुप्ता यांनी व्यक्त केला.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत पोलिसांना देण्याचा प्रयत्न आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रूपये तसेच पोलिस वसाहती सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार कांबळे यांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे किती आवश्यक आहे, हे पोलिस अधिका-यांनी स्पष्ट केल्यानंतर तातडीने यासाठी विकास निधी उपलब्ध करून दिल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. या कार्यक्रमात चांगली कामगिरी केलेल्या पोलिस कर्मचारी, अधिकारी यांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला. वरिष्ट पोलिस निरिक्षक ताम्हाणे यांनी प्रास्ताविक केले. तर पोलिस निरिक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांनी आभार मानले.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला. वेगवेगळ्या ठिकाणी १५० कॅमेरे लावण्यात आले असून अद्यावत कंट्रोल रूम देखील उभारण्यात आलेली आहे. अशी व्यवस्था असलेले समर्थ पोलिस स्टेशन पहिलेच पोलिस स्टेशन ठरले आहे, याचा विशेष आनंद आहे –

गणेश बिडकर, सभागृह नेता,

  • पुणे महानगरपालिका प्रकल्पाची वैशिष्ट्ये…
  • पोलिस स्टेशनच्या हद्दीत ६० ठिकाणी कॅमेरे लावले.
  • हॅस्पिटल, बसस्टँड, गणेश मंडळे, एटीएम सेंटरसह गर्दीच्या ठिकाणांना प्राधान्य
  • २४ चौक झाले कव्हर
  • एकूण ११ किलोमीटरचा भाग देखरेखीखाली
  • पालखी सोहळा, गणेशोत्सव काळत होणार विशेष उपयोग
  • कंट्रोल रूमचे नियंत्रण पोलिस आयुक्तालयातील मुख्य कंट्रोल रूमला जोडण्यात आले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.