निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मदत केल्याचे दिसेल म्हणून ॲमेनिटी स्पेसच्या विषयाला राष्ट्रवादी करणार प्रखर विरोध

Date:

पुणे : महापालिकेच्या अॅमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घकाळ मुदतीने भाड्याने देण्याच्या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेसने आता पूर्ण विरोध करण्याचीच भूमिका घेतली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मदत केल्याने पक्षाचे नुकसान होईल त्यामुळे निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या ८५ आरक्षणाच्या आणि १८५ ॲमेनिटी स्पेसच्या (सुविधा क्षेत्र) जागा खासगी व्यावसायिकांना दीर्घमुदतीने भाड्याने देण्याच्या विषयावर मुख्यसभेत प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या जागा भाड्याने देताना ३३ टक्के जागा अर्बन फॉरेस्टसाठी राखीव ठेवावी व जागांच्या वापराचा मास्टर प्लॅन तयार करावा या मागणीवरून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला पण त्यास अनेक पदाधिकार्यांचा विरोध होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याने गुरूवारी (ता. २६ ) मुख्य सभेच्या काही तास आधी भूमिकेवरून कोलांटउडी घेतली. पदाधिकार्यांनी एकमताने निर्णय घ्यावा असे पवार यांनी सांगितले असताना उलट पक्षात गोंधळ निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीस शहराध्यक्षांसह खासदार, आजी-माजी आमदार, माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.बैठकीमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून झालेल्या गोंधळाबाबत चौकशी केली. त्यावेळी प्रसार माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला असे पवार यांना सांगण्यात आले. त्यानंतर प्रत्येक पदाधिकार्याची भूमिका ऐकून घेतली. त्यामध्ये अॅमेनिटी स्पेसच्या मुद्द्याला पूर्ण विरोध केला पाहिजे. भाजपसोबत जाणे योग्य नाही. जर पाठिंबा दिल्यास त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होईल असे मत पदाधिकार्यांनी मांडले.

तसेच अ‍ॅमेनिटी स्पेसच्या ३३ जागा अर्बन फाॅरेस्ट आणि ३३ जागा रुग्णालय, शाळांसाठी आरक्षीत ठेवल्या पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली. मास्टर प्लान तयार करून महापालिकेने त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या पाहिजेत, त्यानंतरच यास पाठिंब्याचा विचार केला पाहिजे. पण सध्या या प्रस्तावास विरोध केला पाहिजे, असेही मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पवार यांनी सर्वांची भूमिका ऐकून घेत, मुख्यसभेत अ‍ॅमेनिटी स्पेसवा विरोध करण्याची भूमिका मान्य करत, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले.

“३३ टक्के अर्बन फाॅरेस्ट व मास्टर प्लॅन भाजपनै तयार केला नाही आणि या बदलास त्यास पाठिंबा देण्याची भूमिका ती त्या दिवसापुरतीच मर्यादित होती. आता त्याचा काही संबंध नाही त्यामुळे या प्रस्तावास विरोध केला जाईल, असे बैठकीत ठरले आहे.”

– अ‍ॅड. वंदना चव्हाण, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...