न्यायालयाचा निकाल म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड

Date:

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या बाबतीत शुक्रवारी न्यायालयाने दिलेले निकाल म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला थप्पड असून आता तरी सत्तेचा अहंकार सोडावा आणि धमक्या देणे बंद करावे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यात जनादेश धुडकावून लबाडीने सत्ता मिळवली तरीही संविधानाच्या चौकटीत आणि लोकशाही पद्धतीनेच काम करावे लागेल. एखाद्यावर कारवाई करायची असेल तरीही संविधान आणि कायदा यांच्या चौकटीतच करावी लागेल. रस्त्यावरील गुंडगिरीच्या मानसिकतेने वागून चालणार नाही, एवढा बोध या निमित्ताने सत्ताधारी आघाडीच्या प्रमुखांनी घ्यावा आणि मुखपत्रातून धमक्या देणे बंद करावे.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना यापूर्वी अंतरिम जामीन मंजूर करताना दिलेल्या निर्णयाबद्दलचे सविस्तर निकालपत्र आज जाहीर केले तर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना राणावत हिचे कार्यालय पाडण्याबाबत आज निर्णय दिला. या दोन्ही निर्णयात महाविकास आघाडीची सूडबुद्धी आणि आपल्याविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करणे स्पष्ट झाले आहे. कंगना राणावत हिचे मुंबईबद्दलचे विधान समर्थनीय नाही पण त्यावर लोकशाही पद्धतीनेच उत्तर द्यायला हवे. एखादी व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारते म्हणून किंवा आव्हान देते म्हणून सत्तेचा दुरुपयोग करून त्याचे नुकसान करणे योग्य नाही. अशा पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही. देशात संविधान प्रमाण आहे आणि लोकशाही व्यवस्था अंतिम आहे व त्याचे उल्लंघन कोणालाच करता येणार नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...

स्काऊट क्रीडांगणावर मल्लखांब प्रात्यक्षिकांतून सुदृढ शरीर संपन्नतेचा संदेश 

श्री शिवाजी कुल, पुणे संस्थेतर्फे आयोजन ; स्व-रूपवर्धिनी च्या...