पुणे–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान लिहून या देशाला आकार दिला आहे. त्यांनी देशाच्या विकासासाठी आपले मोठे योगदान दिले आहेत. मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केला, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा केला आहे.अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे देखील लोकार्पण केले. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचे काम काँग्रेसने सातत्याने केले. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही.देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा-जेव्हा आम्ही संविधान दिवस साजरा केला. त्या त्यावेळी काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला. असे म्हणत शहा यांनी काँग्रेसवर हल्ला केला.संविधान सर्वश्रेष्ठस्वातंत्र्यानंतर संविधान बनवण्यात बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान राहिले आहे. सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचे काम बाबासाहेबांनी केले आहे. दलित वंचितांना संविधानातून संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अपमान सहन केला. पण संविधान निर्मिती करताना त्यांनी कधी त्यात कटुता येऊ दिली नाही. जगभरात आपले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांना समान अधिकार देणारे संविधान भारताचे आहे. हे केवळ बाबासाहेबांमुळेच घडू शकले. असे शहा म्हणाले.शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित केलेजेव्हा देशात अंधारयुग होते. आशेचा एक किरणही देखील दिसत नव्हता. स्वराज्य आणि स्वधर्म शब्द उच्चारणे देखील जेव्हा कठिण होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित करून टाकले. त्यांच्या या प्रयत्नामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील दोन तृतियांश शहरात स्वराज्य मिळवण्याचे सौभाग्य मिळाले, असे शहा म्हणाले. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली. न्याय, नाविक दल, प्रशासकीय काम आदी गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या, असे देखील शहा म्हणाले.पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक कामे केली. विमानतळापासून ते मेट्रोपर्यंतच्या कामाला हिरवा कंदिल दिला. पुणेकरांना आता लवकरच मेट्रो मिऴणार आहे. स्मार्ट सिटीसाठी 100 कोटी दिले. बस सेवा सुधारण्यासाठी केंद्राने एक हजार अतिरिक्त बसेस दिल्या. मुळा मुठा निधी संवर्धनासाठी 110 कोटींचे काम सुरू आहे. सर्वाधिक स्टार्टअप पुण्यातच आले आहेत. पुण्याच्या विकाससाठी मोठी सरकार संकल्पबद्ध आहे. आम्ही पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही. अशी शाश्वती अमित शहांनी पुणेकरांना दिली आहे.
काँग्रेसने बाबासाहेबांचा त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानच केला; अमित शहांचा हल्लाबोल
Date:

