Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुख्यमंत्र्यांनी भाजपला म्हटले भावी मित्र, फडणवीस म्हणाले – राजकारणात काहीही होऊ शकते

Date:

औरंगाबाद- येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत भाजपला आपला भावी मित्र असल्याचे म्हटले आहे.

तर दुसरीकडे, शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास राज्यातील मतदारांना आनंद होईल असे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. या दोन्ही नेत्यांच्या विधानानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे काही आलबेल आहे का? असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडला आहे.

शिवसेना-भाजप 30 वर्षेसोबत
विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना राज्यात गेल्या 30 वर्षापासून सोबत होते. परंतु, 2019 मध्ये विधानसभा निवडणूक सोबत लढवल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील तीन वर्षे मुख्यमंत्री राहिले तर आम्ही युतीसाठी तयार आहोत. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चांगले समन्वय होईल. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्व विचारसरणीचे असल्याचे सत्तार म्हणाले.

राजकारणात काहीही होऊ शकते – फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर टीप्पणी केली आहे. ते म्हणाले की, ‘त्यांच्या शुभेच्छा… एक चांगली गोष्ट आहे. कारण राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. मात्र, सध्यातरी भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे पाहत नसून आम्हाला एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावयाची आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

संजय राऊतांनी केले मोदींचे कौतुक
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कौतूक केले असून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या उंचीचा दुसरा नेता भारतात नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाजपला वर आणण्याचे काम केले आहे. पूर्वी भाजप इतर पक्षांसोबत युती करून सरकार बनवत असे, परंतु, पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असे संजय राऊत यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले – मी कसे सांगू शकतो मुख्यमंत्र्यांची ‘मन की बात’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीप्पणी केली आहे. ‘ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्या मनात काय चालले आहे? हे मी कसे सांगू? माझ्याशी बोलत असताना ते सरकारचे निर्णय, ते कसे चालवायचे, काय समस्या आहेत यावर चर्चा करतात असे अजित पवार म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...