देवाची उरुळी येथील कचरा प्रकल्पाची क्षमता वाढणार-रामटेकडी येथील कचऱ्यावर प्रक्रियेसाठी पावणेनऊ कोटीचे टेंडर मंजूर

Date:

पुणे- देवाची उरूळी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची दैनंदिन क्षमता वाढविण्यासाठी आणि त्यानुसार प्रत्यक्ष प्रक्रिया होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात देखभाल दुरुस्तीसाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट २३ गावांमुळे शहरातील कचरा निर्मितीत वाढ झाली असून, दररोज २२०० ते २३०० मेट्रिक टन कचर्याची निर्मिती होत आहे. यापैकी २५० ते ३०० मेट्रिक टन कचर्याची कचरा वेचकांमार्फत निर्मितीच्या ठिकाणी विल्हेवाट किंवा पुन:प्रक्रिया केली जाते. यामुळे दररोज १८०० ते १९०० मेट्रिक टन कचर्याचे संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. समाविष्ट गावांमध्ये २५० ते ३०० मेट्रिक टन कचर्याची निर्मिती होत असून, त्याची विल्हेवाट करण्याची यंत्रणा महापालिकेकडे सध्या नाही. त्यामुळे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) निविदा मागविण्यात आल्या होत्या.रासने पुढे म्हणाले, या निविदांना आलेल्या प्रतिसादानुसार पहिल्या टप्प्यात समाविष्ट गावांतील कचरा व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने देवाची उरुळी येथील २०० मेट्रिक टन मिश्र कचरा प्रकल्पाचे प्रकल्पधारक भूमी ग्रीन एनर्जी यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाची दैनंदिन प्रक्रिया क्षमता धारकाच्या खर्चाने किमान १५० मेट्रिक टनने (५० टन जुना आणि १०० टन ओला) वाढविण्यास आणि त्यासाठी प्रकल्प धारकाला लगतची एक एकर जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रक्रिया होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात देखभाल दुरुस्तीसाठी चालू निविदा दराला म्हणजेच प्रती मेट्रिक टन रुपये ५०२ (जीएसटी शिवाय) देण्यास आणि प्रतिवर्ष साडेआठ टक्के दरवाढ याप्रमाणे पुढील १५ वर्षांसाठी सुधारीत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.रासने म्हणाले, रामटेकडी येथे साठलेल्या एकूण ७५ हजार ८६३ मेट्रिक टन कचर्यापैकी ६४ लाख २३५ मेट्रिक टन कचर्याच्या विल्हेवाटीचे काम बाकी आहे. गेल्या दोन महिन्यांत ११ हजार ६३८ मेट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया करण्यात आली होती. रामटेकडी येथे प्रक्रियेसाठी पुरेशी जागा नसल्याने तेथून कचर्याची वाहतूक करून अन्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रति मेट्रिक टन ८७५ रुपये या प्रमाणे निविदेला मान्यता देण्यात आली असून, सुमारे एक लाख मेट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी ८ कोटी ७५ लाख रुपये पर्यंतचे काम करून घेण्यास मान्यता देण्यात आली.

२६ फेब्रुवारीला आयुक्तांचे अंदाजपत्रक

महापालिका आयुक्तांना येत्या २६ फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजता पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मांडण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.रासने म्हणाले, महापालिका अधिनियम कलम ९५ नुसार महापालिकेचे महसूली, भांडवली इत्यादी उत्पन्न आणि खर्चाच्या अंदाजपत्रकाचा आराखडा आयुक्तांनी दरवर्षी १५ जानेवारीपूर्वी स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. या वर्षी सार्वत्रिक निवडणूक कामकाज असल्यामुळे २६ फेब्रुवारीला अंदाजपत्रक मांडण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाने ठेवला होता. स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली.

कोथरुड बालनाट्यगृहात विविध विकासकामे-३ कोटी १० लाख ८२ हजार रुपयांचे टेंडर मंजूर

कोथरुड येथे नव्यान बांधण्यात येणार्या बालनाट्यगृहात मल्टिलेव्हल पार्किंगवरील पोडियम व सभागृह इत्यादी विकासकामे करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली.रासने म्हणाले, विविध विकासकामांसाठी ३ कोटी १० लाख ८२ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. सुमारे ३८ लाख रुपये जीएसटी, १ लाख ५८ हजार रुपये रॉयल्टी चार्जेस आणि ३२ हजार रुपये मटेरियल टेस्टिंग शुल्कापोटी अदा करण्यात येणार आहेत.

शिक्षण मंडळातील रोजंदारीवरील ९६ सेवकांना मिळणार बोनस

शिक्षण मंडळातील रोजंदारीवरील ९६ सेवकांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.रासने म्हणाले, बोनस मिळण्यासाठी सेवकांना १७४ दिवस काम करणे बंधनकारक असते. परंतु या वर्षी कोरोनामुळे या सेवकांना कामावर रुजू करुन घेण्यासाठी प्रशासनाकडून विलंब झाल्याने त्यांचे १७४ दिवस पूर्ण भरू शकले नाहीत. मात्र कोरोना काळात या कर्मचार्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंतर्गत त्यांना दिलेली कामे आणीबाणीच्या स्थितीतही योग्य पद्धतीने पार पाडली. या बाबीचा सकारात्मक विचार करुन ९६ कर्मचार्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

मनपा सेवकांच्या गणवेश दरांना मान्यता

पुणे – महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या गणवेश आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी दरांना स्थायी समितीने मान्यता दिली.रासने म्हणाले, महापालिकेच्या मान्य गणवेश नियमावलीनुसार तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्यांना गणवेश आणि इतर साहित्य खरेदीसाठी या दरांनुसार रोख स्वरुपात त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. सेवक, निरीक्षक, शिपाई, वाहनचालक, सुरक्षारक्षक, रखवालदार आदी सेवकांना गणवेश दिले जातात. गणवेशासह बूट, चप्पल, सॅण्डल, हॅण्डग्लोज, गमबूट, हेल्मेट, मास्क, रेनकोट, सेफ्टी गॉगल, जंतुनाषक साबण, ऑफीस बॅग आदी साहित्याचा आवश्यकतेनुसार समावेश केला जातो.

राज्य क्रीडा पुरस्कारार्थींचा सत्कार

राज्य सरकारच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आणखी ६ खेळाडू आणि ११ मार्गदर्शकांचा पुणे महापालिकेच्या वतीने पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती रासने यांनी दिली.रासने म्हणाले, शिवछत्रपती पुरस्काराच्या धर्तीवर शहरातील गुणवंत खेळाडूंना पुणे महापालिका क्रीडा पुरस्कार देते. प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पूर्वी २३७ खेळाडू आणि प्रशिक्षकांची निवड करण्यात आली होती. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आणखी ६ खेळाडू आणि ११ प्रशिक्षकांनी क्रीडा समितीकडे नव्याने अर्ज केले होते. त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण २५५ खेळाडूंचा गौरव होणार आहे. त्यासाठी आवश्यक निधीला मान्यता देण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.