राज्य सरकारकडून होणाऱ्या कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे-अर्णब गोस्वामींचा जामीन कायम

Date:

नवी दिल्ली अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर ज्या दिवशी उच्च न्यायालय निर्णय घेईल, त्या दिवसापासून पुढील ४ आठवडे त्यांना जामीन मिळेल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. राज्य सरकारकडून कायद्यांचा दुरुपयोग केला जाणार नाही, यासाठी कनिष्ठ न्यायालयांनी सतर्क राहावं, असा इशारादेखील सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मिळालेला जामीन कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. मुंबई उच्च न्यायालयात अर्णब गोस्वामीची याचिका जोपर्यंत निकाली निघत नाही, तोपर्यंत त्यांना मिळणारा जामीन कायम असेल, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर ज्या दिवशी उच्च न्यायालय निर्णय घेईल, त्या दिवसापासून पुढील ४ आठवडे त्यांना जामीन मिळेल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. राज्य सरकारकडून कायद्यांचा दुरुपयोग केला जाणार नाही, यासाठी कनिष्ठ न्यायालयांनी सतर्क राहावं, असा इशारादेखील सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

वैयक्तिक हेवेदावे आणि भांडणं मिटवण्यासाठी गुन्हेगारी कायद्यांचा उपयोग होत असेल, तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयांनी सावध राहावं, असा इशाराही न्यायालयानं दिलाय. एखाद्या नागरिकाला जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी सरकार गुन्हेगारी कायद्यांचा वापर करत असेल, तर ते चुकीचं असल्याचा शेराही सर्वोच्च न्यायालयानं लगावलाय.राज्य सरकार कायद्यांचा दुरुपयोग करत असल्याची बाब ज्यांनी उजेडात आणली, त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे सतत उघडे असायला हवेत, असंही कोर्टानं म्हटलंय.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...