आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धेत चुरस रंगणार

Date:

पुण्यात 28 एप्रिल ते 5 मे 2019 दरम्यान रंगणार स्पर्धा

पुणे-: पुण्यातील मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब या टेनिस कोर्टवर येत्या 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत पहिलीवहिली 3000डॉलर पारितोषिक रकमेची फिनआयक्यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धा रंगणार असून यामध्ये भारताच्या साई संहिता चमर्थी आणि मिहिका यादव या डब्लूटीए मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

स्पर्धेला फिनआयक्यू यांनी प्रायोजित केले असून नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे एमएसएलटीए यांच्या सहकार्याने आशियाई टेनिस संघटना व अखिल भारतीय टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिसस संघटना यांच्या मान्यतेखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोफेशनल टूर स्पर्धांविषयी अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे या विभागातील टेनिस पटूंचे हित ध्यानात घेऊन आशियाई टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या महिला आशियाई टेनिस टूर स्पर्धा मालिकेतील हि पहिलीच स्पर्धा ठरणार आहे.

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, भारतातील व्यावसायिक स्पर्धांची संख्या कमी झाल्यामुळे तसेच, कॅलेंडरमध्ये अनेक अनपेक्षित बदल करण्यात आल्यामुळे कनिष्ठ स्तरावर खेळाडूंना मिळणाऱ्या एटीपी/डब्लूटीए गुणांच्या संख्येवरही मर्यादा आल्या आहेत, हे ध्यानात घेऊन आशियाई टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या या नव्या महिला टेनिस टूर स्पर्धांमुळे उदयोन्मुख खेळाडूंना फायदा मिळणार आहे.

घरच्या व मायदेशातील मैदानावर होणाऱ्या या स्पर्धांमुळे मिळणाऱ्या गुणांचा उपयोग करून खेळाडूंना परदेशातील स्पर्धांमध्ये प्रवेश मिळविता येणार आहे. त्यामुळेच एटीटी महिला मानांकन स्पार्धा अधिकच महत्वाच्या बनल्या असून या स्पर्धांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर आशियाई चॅलेंजर स्पर्धांसारख्या वरिष्ठ किंवा व्यावसायिक स्पर्धांमध्ये वाईल्ड कार्ड देणे शक्य होणार असल्याचे सुंदर अय्यर यांनी सांगितले.

या पद्धतीने देण्यात येणाऱ्या वाईल्ड कार्ड प्रवेशांना 2020 मध्ये सुरुवात होणार असून यंदाच्या वर्षाअखेरच्या मानांकन यादतीतील अव्वल 10 खेळाडूंना ही संधी मिळणार आहे.त्यामध्येही आशिया खंडात 2020 मध्ये होणाऱ्या एटीपी चॅलेंजर स्पर्धांमध्ये 10 पुरुष मानांकित खेळाडूंना हा मान मिळणार असून महिला गटातील 25000डॉलर किंवा त्यावरील दर्जाच्या आयटीएफ स्पर्धांमध्ये 10 अव्वल महिला खेळाडूंना वाईल्डची संधी मिळणार असल्याचे स्पर्धा संचालक नवनाथ शेटे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, हि पहिलीवहिली स्पर्धा 3000डॉलर पारितोषिक रकमेची असून केवळ एकेरी गटात होणाऱ्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये 32 व पात्रात फेरीत 64 खेळाडूंना प्रवेश देण्यात आला आहे.यातील भारतीय खेळाडूंचा सहभाग पाहताना या महिला खेळाडू उच्च दर्जाच्या स्पर्धेतही स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्सुक असल्याचे यावरून दिसून येते.

या स्पर्धेतील विजेत्या महिला खेळाडूला एटीपी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 50,75 व 100 गुणांची कमाई करता येणार आहे. तसेच या गुणांचे रुपन्तर एआयटीए गुणांमध्ये थेट करता येणार आहे. मुख्य ड्रॉमध्ये 24 थेट प्रवेशिका, 4 वाईल्ड कार्ड प्रवेशिका आणि पात्रता फेरीतून 4 स्पर्धकांचा समावेश असणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 31हजार रुपये व करंडक, तर उपविजेत्या खेळाडूला 20हजार रुपये व करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीतील खेळाडूला 12हजार रुपये, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना 8500रुपये, पहिल्या फेरीतील खेळाडूंना 5000रुपये आणि मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करणाऱ्या खेळाडूला 3500 रुपये देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने रविवार व सोमवार या दिवशी होणार आहे.

स्पर्धेतील मानांकित खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:

1.साई संहिता चमर्थी, 2. मिहिका यादव, 3. भुवना कलवा, 4.निधी चिलूमुला,  5. काव्या सव्हानी, 6 प्रेरणा विचारे, 7. श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती, 8.  रिया उबवेजा. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.