दशरथ यादव यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावला राज्यस्तरीय कविसंमेलन

Date:

सीमाकवी रविंद्र पाटील यांची माहिती

सासवड  – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय कविसंमेलन बेळगाव येथे दि. १६ नोव्हेंबर रोजी होणार असून, प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगणार आहे. अशी माहिती साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी दिली.

बेळगाव येथे होणा-या विशेष कविसंमेलनाला सुप्रसिद्ध मराठी नाट्य चित्रपट अभिनेते वसंत अवसरीकर, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व चित्रपट दिग्दर्शक शरद गोरे, शेतकरी कवी राजेंद्र सोनवणे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातील कवींनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

श्री यादव हे सध्या गाजत असलेल्या वारीच्या वाटेवर या महाकांदबरीचे लेखक असून, उन्हातला पाऊस, शिवधर्मगाथा, यादवकालीन भुलेश्वर, सुतसंस्कृती, घुंगुरकधा, मातकट, गुंठामंत्री, पोवाडा पुरुषोत्तमाचा, लेखणीची फुले, बालाघाटचा सिंह, आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. ढोलकीच्या तालावर सिनेमासाठी गीत लेखन केले असून, रणांगण सिनेमाचे संवाद व पटकथा त्यांची आहे. पत्रकार, कवी, लेखक, कांदबरीकार, इतिहास संशोधक, नाटककार, वक्ता, गीतकार असे अष्टपैलू साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे.

नवोदित कवि लेखकांना संधी देऊन त्यांच्या लेखनाला बळ देण्याचे काम साहित्य परिषदेच्या वतीने केले जाते. खेड्या पाड्यातील साहित्यिकांना संधी देऊन शेता शिवारातील साहित्याला न्याय देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश परिषदेचा आहे. असे श्री पाटील यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...