टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील सहभागी खेळाडूंचा क्रीडा मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते सत्कार

Date:

पुणे, दि.14: क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील सहभागी खेळाडूंचा सत्कार  आणि एशियन गेम्स जकार्ता 2018  मध्ये ब्रीज खेळातील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मागर्दशकांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे म्हाळुंगे-बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड मध्ये आयोजित या कार्यक्रमाला क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री  कु.अदिती तटकरे (दूरदृश्यप्रणालीद्वारे), शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा  व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया,  आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रच्या नियामक परिषद सदस्य, सहसंचालक चंद्रकांत कांबळे उपस्थित होते. 

श्री.केदार म्हणाले, येणाऱ्या पिढीतील खेळाडूंचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येत आहे. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे यासाठी महाराष्ट्र शासन खेळाडूंना सहाय्य करण्यासोबतच त्यांच्या भविष्याची काळजी घेईल. खेळाडू आणि मार्गदर्शक यांच्या सहकार्याने क्रीडा क्षेत्रात राज्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, कोरोना काळात अनेक अडचणी असतानादेखील राज्य शासनाने खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. क्रीडा विद्यापिठाच्या माध्यमातून पुढील ऑलिम्पिकमधील यशाची पायाभरणी होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी खेळाडूंनी जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना शासनाने उपलब्ध करून दिलेल्या क्रीडा सुविधा आणि क्रीडा विद्यापीठाची माहिती दिल्यास त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीत राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा क्रीडा क्षेत्रातील अनुभव उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.बकोरिया यांनी खेळाडूंसाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा आणि अर्थसहाय्यची माहिती दिली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी राज्यातील 7 खेळाडू आणि 3 पॅरा खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात सिंथेटिक ट्रॅक उभारण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

यावेळी क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते शूटिंग प्रशिक्षक सुमा शिरूर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, आर्चरी खेळाडू प्रवीण जाधव, बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, अॅथलीट अविनाश साबळे, नौकानयनपटू विष्णू सरावनन, गोल्फपटू उदयन माने, पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी जलतरणपटू सुयश जाधव, नेमबाज स्वरुप उन्हाळकर, अॅथलीट भाग्यश्री जाधव या खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर जकार्ता येथे 2018 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये ब्रिज या क्रीडा प्रकारात पदक प्राप्त खेळाडू जग्गी शिवदासानी, अजय खरे, राजू तोलानी, हेमा देवरा, गोपीनाथ मन्ना, राजीव खंडेलवाल, हिमानी खंडेलवाल आणि मार्गदर्शक केशव सामंत यांना 20 लाखाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...