Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नारायण राणेंना खडे बोल -चंद्रकांत पाटलांना चिमटा आणि पत्रकारांना टोमणे -उपमुख्यमंत्री पवार यांची पत्रकार परिषद (व्हिडीओ)

Date:

पुणे: इतर वेळी पवारसाहेबांचे वाकून दर्शन घ्यायचे आणि नंतर अन्यवेळी पवार साहेबांबद्दल काहीतरी वक्तव्य करायचे हि काय पद्धत झाली काय ? नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही दिले आरक्षण असे म्हणत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांना खडे बोल सुनावले, तर झोपेत असताना सरकार पडेल ,आम्ही बोलायला लागलो तर … अशा आ. चंद्रकांत पाटलांची खिल्ली ,’ आरे बापरे … झोपेतून जाग आली कि टीव्ही लावतो ,चानेल बदलत बदलत पाहतो सरकार पडले काय … अशा शब्दात चंद्रकांत पाटलांना चिमटा काढत जोपर्यंत तिन्ही नेते एकत्र आहे तोवर हे सरकार कोणी पाडू शकत नाही ,पुन्हा हा प्रश्न करू नका असे स्पष्ट केले तर काही प्रश्नांवर त्यांनी पत्रकारांना देखील टोमणे मारले. पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला लोकप्रतिनिधी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ४ वेळा मुख्यमंत्री होते. मात्र त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा आलाच नाही. यावरूनच कळते काय ते, असं म्हणत अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांनी टोला लगावला होता. नारायण राणे यांच्या या वक्तव्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणेंनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण का दिलं नाही, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे हे काय नारायण राणेंना समजत नाही का, असा टोला देखील अजित पवार यांनी लगावला. त्याचप्रमाणे नारायण राणेंना समितीत घ्या, ही माझीच सुचना असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा शत्रू नसतो. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट शरद पवार आजारी होते म्हणून झाली. माणुसकीच्या नात्याने भेट झाली आहे. मी उद्या भाजपाच्या नेत्याला भेटायला गेलो, म्हणून काय जवळीक साधली असं होत नाही, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

चंद्रकांत दादा पाटील मोठे माणूस

भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील मोठे माणूस आहेत. मी बोलायला लागलो तर फटकळ म्हणाले. ते सारखे झोपेतून जागा होऊन सरकार पडलं का म्हणत असतात. त्याचं हे चॅनल बघ, ते चॅनल बघ सुरु असतं, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला.

लॉकडाउनच्या बाबतीत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला तो पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या आत आहे तिथे आहे. काल समज- गैरसमज झाले. थोड्या वेगळ्या बातम्या आल्या. पण उद्धव ठाकरे यांचाच निर्णय अंतिम राहणार आहे. तसेच पुणे शहरात पॉझिटिव्हीटी रेट ५ पर्यंत आला आहे. त्यामुळे सोमवारपासून पुणे, पिंपरी चिंचवडबाबत वेगळे धोरण अवलंबिले जाणार आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे पुण्यात अनलॉकची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची शक्यता आहे.

पवार म्हणाले. पुणे ग्रामीणमध्ये सूट दिली जाणार नाही कारण नाही तिथे पॉझिटिव्हिटी अद्यापही जास्त आहे. गाईडलाईन प्रमाणे काम सुरु आहे. हे सातत्य टिकले पाहिजे, यात कुचराई होउ नये. पुण्यात ब्लॅक फंगस साठी मोठी बिलं येत होती.सरकारी हॉस्पिटल मध्ये बिलं काय लावायची याचे आदेश काढलेले आहेत.खासगी रुग्णालयवाल्यांनी २० -२२ लाख बिलं लावली आहेत. नवे दर दिलेले आहेत. तिन्ही प्रकारच्या बेडची उपलब्धता सगळीकडे आहे.

पुढे पवार म्हणाले, ब्लॅक फंगसच्या औषधाची अजून कमतरता आहे. पुण्याला खडकी आणि पुणे कॅन्टॉनमेंट पुणे शहरात धरले जात नाहीत. पुणे शहराची नियमावली या कॅन्टॉनॅमेंटला लावावी लागणार आहे. देहुला १०% पॉझिटिव्हीटी त्यामुळे तिथे दिलासा नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी काढलेले आदेश स्पष्ट आहेत. रोजची आकडेवारी पाहून सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे.

वारकऱ्यांना समजवायचा प्रयत्न केला. त्यांनी समितीची मागणी केली. सौरभ राव आणि लोहिया यांच्या उपस्थितीमध्ये समिती नेमली आहे. वारकऱ्यांची मागणी वेगळा विचार करा. ते तीन चार दिवसांत रिपोर्ट देतील. वारकरी म्हणतात ५० लोक जाणार पण पालखी पुढे जाईल तसे लोक दर्शनाला येतील. समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दाखवणार ते अंतिम निर्णय घेतील. असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकांची प्रभाग रचना कशी करायची याचा निर्णय महाविकास आघाडी मधले तिन्ही पक्ष मिळुन घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. निवडणुका कधी होतील हे मात्र ठरवण्याचा अधिकार सरकारला नाही. पक्षांची तयारी सुरु झाली की तुम्हांला आपोआप कळेल असंही ते म्हणाले आहेत.

राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीला आता एक वर्षा पेक्षा कमी कालावधी राहिला आहे. मुंबई, पुणे आणि इतर काही महापालिकांचा यात समावेश आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या वर्षीच काही महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत.

त्यामुळे यंदाच्या निवडणुका वेळेवर होणार का याबाबत विचारले असता पवार म्हणाले ” निवडणुका कधी घ्यायच्या हा निर्णय राज्य सरकार घेत नाही. आणि राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली की कळतेच. ते कोणाला सांगायची गरज पडत नाही”.

दरम्यान, प्रभाग रचना बदलणार का याबाबत बोलताना महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष मिळुन याबाबत निर्णय घेतील असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार म्हणाले ” एक सदस्यीय प्रभाग का दोन याचा निर्णय अजून झाला नाही. यापुर्वी १-२-३ सदस्यीय असं पुर्वी झालं आहे. तेव्हा वेगळी सरकारं होती. आता तिन्ही पक्ष बघु आणि निर्णय घेऊ असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...