तेलंगणा- नऊ राज्यातील तुम्ही सरकारं पाडत एक प्रकारे विक्रमच केलाय, अशी बोचरी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. तसेच केंद्र सरकारने आश्वासने पूर्ण न केल्यामुळे प्रश्नचिन्हही उपस्थित केले.
हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित 19 राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीने राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन करत शक्ती प्रदर्शन केलेय. के चंद्रशेखर राव यांनी यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. तेलंगाणाचे के मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शनिवारी राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे स्वागत केले. दुसरीकडे ते विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत न करत त्यांनी शासकीय शिष्टाचारचं उल्लंघन केल्याचं म्हटले जातेय.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त आहात. आतापर्यंत तुम्ही नऊ सरकारे पाडली आहेत. तुम्ही हा एक विक्रमच केलाय.

