मतमोजणीवेळी ट्रम्प समर्थकांचा गोंधळ, संसदेत गोळीबार; एका महिलेचा मृत्यू

Date:

वॉशिंग्टन-अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीनंतर ज्याची भीती होती तेच घडले. बुधवारी येथे बुधवारी जो बिडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेचे दोन्ही सभागृह एकत्र आले. मतमोजणी दरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शेकडो समर्थक संसद भवन (कॅपिटल हिल) मध्ये घुसले. यावेळी गोळीबार देखील झाला आणि एका महिलेचा मृत्यू झाला. कित्येक तासांनंतर आम्ही निर्भयपणे आपले काम सुरू ठेवू असे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह (एचओआर) ची अध्यक्ष नॅन्सी पेलोसी म्हणाल्या. दरम्यान बायडेन यांच्या विजयाची औपचारिक घोषणा कधी होईल हे अद्याप निश्चित झाले नाही.बुधवारी इलेक्ट्रॉल कॉलेजच्या मतांची मोजणी आणि बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृह सीनेट आणि HOR ची बैठक सुरु झाली. यादरम्यान ट्रम्प आणि रिपब्लिकन पार्टीचे शेकडो समर्थक संसदेच्या बाहेर जमा झाले. नॅशनल गार्ड्स आणि पोलिस त्यांना समजावून सांगण्यापूर्वी काही लोक आत शिरले. मोठ्या प्रमाणात तोड़फोड आणि हिंसा झाली. यादरम्यान गोळीबारही झाला. मात्र ही गोळी कोणी आणि का झाडली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र यात एका महिलेचा मृत्यू झाला.. गदारोळ सुरू असताना खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. ते पुन्हा सदनात दाखल झाले असून संसदेच्या कार्यवाहीला पुन्हा सुरुवात झाली.

न्यूयॉर्क टाइम्सने एक फोटो द्वारे सांगितले की, जेव्हा ट्रम्प समर्थक संसदेत गोंधळ घालत होते, तेव्हा काही पोलिस अधिकाऱ्यांना दंगलखोरांवर बंदूक धरली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र या महिलेचा मृत्यू पोलिसांच्या गोळीने झाला की, दुसरीकडून कोणी गोळी झाडली हे अद्याप समजले नाही.या घटनेनंतर डीसी मधील अमेरिकन सैन्याच्या विशेष तुकडीला पाचारण करण्यात आले. मात्र 20 मिनिटात त्यांन मोर्चा सांभाळला. कॅपिटल हिलच्या बाहेर आणि आत एकूणच 1100 विशेष गार्ड तैनात असून संचारबंदी लागू आहे.

अमेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर होणार होता. त्याआधी ट्रम्प यांचे हजारो समर्थक अमेरिकन संसद भवन (यूएस कॅपिटल हिल) समोर जमले. ते निवडणूक निकाल रद्द करण्याची मागणी करत होते. या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप आहे. ट्रम्प यांचे बहुतेक समर्थक लाल टोपी आणि निळ्या कपड्यांमध्ये पोहोचले. हे दोन रंग ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या ध्वजाचे रंग आहेत. हिंसाचार करणाऱ्यांच्या हातात निळे बॅनर होते, ज्यावर – KEEP AMERICA GREAT असे लिहिले होते. म्हणजेच अमेरिकेला महान बनवून ठेवा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...