सिनेसृष्टीत काम मिळावे यासाठी अनेक कलाकार अथक धडपड करत असतात. अनेकजण लॉबीला कंटाळून किंवा कौशल्य पूर्ण पणाला लाऊन किंवा कितीही कोणाच्याही पुढे मागे करून अयशस्वी होतात आणि माघारी फिरतात ,सारी स्वप्ने , उमेद यांचा चुराडा होतो , अंगी गुण असूनही योग्य संधी मिळत नाही म्हण्यापेक्षा दिली जात नाही , आणि अयोग्य व्यक्तींना मात्र संधी देऊन देऊन डेव्हलप केलं जातं , अनेकदा या कलाकारांना कास्टिंग काऊचसारख्या प्रकाराचाही सामना करावा लागतो. सिनेसृष्टी मग ती बॉलिवूडअसो वा हॉलिवूड वा कोणत्याही प्रांतातील असो यातील अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत पुढे येऊन कास्टिंग काऊचबद्दल उघडपणे वक्तव्यंं केली आहेत. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने याबाबत भाष्य केले आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मीनल बाळ हे तिचे नाव . तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच भेटली तू पुन्हा, इरादा पक्का यासारख्या चित्रपटातही ती झळकली. तसेच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतही तिने ‘लाडी’ ही भूमिका साकारली होती. नुकतंच मीनलने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहेतिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
कौआ मोती खायेगा – तिने म्हटले आहे पोस्टमध्ये ते वाचा –
“प्रामाणिकपणे खूप मनापासून सिरियसली काम करणं, विचार करून चांगलं काम करण्याची धडपड, संयम, श्रध्दा, मेहनतीचं फळ वगैरे सब झूट है!!! कोणाच्या तरी मागे मागे करा, करेक्ट लोकांच्या संपर्कात रहा, एखाद्या ग्रूपशी संलग्न रहा, खूप गोड (खोटं खोटं) वागा आणि बास झालं काम.
मग काय कामावर काम मिळत राहणार आणि मग वर वर काम केलं तरीही किंवा काम येत नसेल तरीही फरक पडणार नाही. तुमच्या डोक्यावर क्राऊन हा असणारच आणि मग त्याचाच रुबाब (attitude) करायचा आहे की नाही वर जाण्याचा म्हणजे प्रसिद्ध होण्याचा मार्ग. शू…..कोणाला सांगू नका हा , हा मार्ग मी तुम्हाला सांगितला ते… आपलं सिक्रेट.
रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना तुन का, कौआ मोती खाएगा. ता. क.- वरील मजकूर हा कोणालाही म्हणजे कोणालाही उद्देशून नाही किंवा सर्वांनाच लागू होत नाही किंवा मला आक्षेप नाही, अशी पोस्ट मीनलने शेअर केली आहे.


