पुणे, दि. १९ फेब्रुवारी २०२२:छत्रपती शिवाजी महाराज यांनी माणुसकीच्या मूल्यावर स्वराज्य निर्माण केले. त्यांचा लढा हा जाती किंवा धर्माविरुद्ध नव्हे तर कुप्रवृत्तींविरुद्ध होता. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी होता असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी शनिवारी (दि. १९) केले.
महावितरण व महापारेषणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावळे मुख्य वक्ते म्हणून प्रा. श्रीधर साळुंखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार (महावितरण) व श्री. जयंत विके (महापारेषण), अधीक्षक अभियंता श्री. सतीश राजदीप यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करून शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुरेश जाधव तर सूत्रसंचालन श्री. बाबा शिंदे यांनी केले तर श्री. वसंत ढवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण, महापारेषणमधील अभियंते, अधिकारी व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

