७० वर्षांनी देशावरचा कलंक हटवलाः संजय राऊत

Date:

नवी दिल्ली -गेल्या ७० वर्षांपासून जम्मू- काश्मीरच्या कलम ३७० चा कलंक घेऊन हा देश जगत होता. पण केंद्र सरकारने आज हा कलंक हटवला आहे, असं सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. जम्मू-काश्मीरचा आज खऱ्या अर्थाने भारतात समावेश झाला, असं राऊत म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर, दीनदयाल उपाध्याय, पंडित श्यामा प्रसाद मुखर्जी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं. या निर्णयाबद्दल हे नेते आज केंद्र सरकार स्वार्गातून पुष्पवृष्टी करत असतील. ७० वर्षांपासून हा निर्णय रोखून धरला होता. संपूर्ण देश या निर्णयाची अतूरतेने वाट पाहत होता. अखंड भारताचा विचार केला तर जम्मू-काश्मीरचा १९४७ ला नाही तर खऱ्या अर्थाने आज भारतात समावेश झाला आहे, असं राऊत म्हणाले. ३७० हटवण्याविरोधात धमक्या दिल्या जात होत्या. तर ३७०ला हात लावाल तर दंगली भडकतील. हात पोळतील. हिम्मत असेल तर हात जाळून दाखवा. हे सरकार गप्प बसणार आहे. पंतप्रधा मोदी आणि गृहमंत्री शांत राहणार नाहीत. ही जाळण्याची आणि धमक्यांची भाषा आता बंद व्हायला हवी. हे सरकार किती भक्कम आहे आणि देश अखंड ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. ती हिम्मत ते धाडस या सरकारनं दाखवलं आहे. सरकार किती भक्कमपण आहे, हे यावरून स्पष्ट होतं, असं संजय राऊत यांनी आधोरेखित केलं.

कलम ३७० हटवण्याला विरोध करणारे तेच आहेत ज्यांनी ७० वर्षांपासून जम्मू-काश्मीरच्या जनतेचे शोषण केलं. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखलं. भारत आपला शत्रू आहे हे शिकवं. पण काश्मिरी पंडित असो की तेथील मुस्लिम बांधव सर्वांचीच ३७० कलम हटवण्याची इच्छा होती. पण ते होऊ दिले नाही जात नव्हते. मात्र आता हा निर्णय झालाय. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, ८ ऑगस्ट क्रांती दिन आणि आजचा ५ ऑगस्ट हा दिवसही एक क्रांतिकारी ठरला आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
हा अतिशय कठीण निर्णय आहे. धाडसी आहे. याला विरोध होणार. पण विरोधक झोपलेत. त्यांना झोपू द्या. आपण काम करू. आज जम्मू- काश्मीर आले. उद्या बलुचिस्तान मिळवू आणि अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करू. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा नक्कीच अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील, अशी आशा आहे, असं सांगत राऊत यांनी सरकारचे अभिनंदन केले.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/715758498864355/

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...