अनिल देशमुखांच्या बाबतीत आता आवाज कमी झाला तसा नवाब मालिकांबाबतही होईल ?
पुणे- पवार साहेबांचा नेहमीच प्रयत्न समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा राहिला, कधी ते मराठा विरुध्द अमराठा करतात ,तर कधी ते अल्प संख्याक विरुध्द अन्य असा निर्माण करतात हे त्यांचे ५० वर्षे चाललेले राजकारण सगळ्या समाजला माहिती आहे, नवाब मलिक प्रकरणी त्यांनी केलेले वक्तव्य यामुळे कदाचित मुस्लीम समाजामध्ये त्यांच्याबद्दल बरे मत होईल पण त्यांनाही माहिती आहे हे सर्व मतांसाठी चाललेले आहे असा स्पष्ट आरोप आज येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला , नवाब मालिकांवर इडी ने केलेल्या कारवाई नंतर शरद पवार यांनी मुस्लीम म्हटले कि दाऊद शी संबध जोडायचा प्रयत्न करण्याचे राजकारण करायचे काय ? अशा स्वरूपाचा प्रश्न उपस्थित केला होता यावर आ. पाटील यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे .आज पुणे महापालिकेतील विविध प्रश्नांबात आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते .भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत यावे म्हणून पुणे पोलीस ठाण्यात नेले जाते असा आरोप पुन्हा पुन्हा करत यांनी 50 वर्षात काय केले? असा प्रश्न देखील पुन्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज केला .पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात …
“महाविकास आघाडीने अनिल देशमुखांच्या बाबतीत सुरुवातीला बोलताना आता आवाज कमी झाला. आता अनिल देशमुख कोण असा ते प्रश्न विचारत आहेत. तसे होऊ देऊ नका. एखादी चौकशी सुरु असल्याने त्याच्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. सुरुवातीला आरोप केले जातात. छगन भुजबळ दोन वर्षे आत होते पण कोणत्या कोठडीत होते कोणालाचा पत्ता नव्हता. आता अनिल देशमुख कुठे आहेत हे पण माहिती नाही. त्यामुळे आरोप क्षीण होतील, असे आता नवाब मालीकांबाबत होऊ देऊ नका असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

