Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मोदींच्या विचाराच्या सरकारचे लाजीरवाणे आणि घृणास्पद कृत्य

Date:

बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींचा सत्कार ;देशासाठी हे अत्यंत चिंताजनक चित्र, विचार करण्याची वेळ;संजय राऊत,नवाब मलिक ,अनिल देशमुख यांच्यावरील ED ची कारवाई भाजपच्या दबावाखाली .

ठाणे :बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना तुरुंगातून सोडण्यात आले. एवढंच नव्हे तर त्यांचा तुरुंगातून सुटल्यानंतर जाहीर सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्त्री वर्गाचा सन्मान करण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर गुजरातमध्ये मोदींच्याच विचाराच्या सरकारने लाजीरवाणे आणि घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना आरोपींना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतला. हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुजरातमधील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला तर फक्त बोलणं महत्त्वाचं नसून कृती महत्त्वाची असते, अशा शब्दात पंतप्रधान मोदींना टोला लगावला.

‘माणसं फोडणं, साधणांचा वापर करणं आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं गंभीर चित्र या देशासमोर आज दिसत आहे. त्यामुळे देशातील बिगरभाजप पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधून लोकशाही मार्गाने आलेली सरकारं पाडण्याचं जे कृत्य सुरू आहे त्याविरोधात जनमत तयार करण्यासाठी लढा उभा करण्याचा आम्ही विचार करत आहोत,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

बिल्किस बानोच्या प्रकरणातील दोषींच्या सुटकेवरुन देशभरात निदर्शने होत आहेत. बिल्किस बानोला न्याय मिळावा यासाठी अनेक समाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही देखील बिल्किस बानोला न्याय मिळावा म्हणून राज्यभर मूकनिदर्शने केली. आज शरद पवार यांनी ठाणे शहरात पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारने घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार यांनी जोरदार टीका केली.जन्मठेप ही आजन्म असते. पण बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना तुरुंगातून सोडण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांचा तुरुंगातून सुटल्यानंतर जाहीर सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्त्री वर्गाचा सन्मान करण्याची भूमिका मांडली होती. मात्र, त्यानंतर गुजरातमध्ये मोदींच्याच विचाराच्या सरकारने लाजीरवाणे आणि घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना आरोपींना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतला. हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे. अशा अनेक विरोधाभासी गोष्टी या सरकारमध्ये पाहायला मिळतात, असे शरद पवार यांनी म्हटले.

सरकारे पाडण्याचे कृत्य
पुढे पवार यांनी सांगितले की, विरोधी पक्ष जर सत्तेत असतील तर त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे. माणसे फोडणे, साधणांचा वापर करणे आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गंभीर चित्र आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा असे प्रकार झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही लोक फोडले आणि सरकार स्थापन केले. त्यामुळे देशातील बिगरभाजप पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद साधून लोकशाही मार्गाने आलेली सरकारे पाडण्याचे जे कृत्य सुरू आहे, त्याविरोधात जनमत तयार करण्यासाठी लढा उभा करण्याचा आम्ही विचार करत आहोत

महिलांवर अत्याचार
महिलाच्या सुरक्षेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदी यांचं 15 ऑगस्टच भाषण ऐकल, त्यामधे स्त्री वर्गाबाबत ते बोलले होते. पण, भाजपच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना गुजरात सरकारने त्यांना सोडले आणि त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मोदींच्या राज्यात एका महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना सोडण्यात आले आहे. हे अत्यंत चिंताजनक चित्र आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...