शकुंतला फडणीस यांना अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे श्रद्धांजली

Date:

पुणे : शकुंतला फडणीस यांचे व्यक्तिमत्त्व निगर्वी, निरामय, निस्पृह आणि निरलस होते, अशा शब्दांत ज्येष्ठ बालसाहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी फडणीस यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.
अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे आज (दि. 25 एप्रिल) दिवंगत लेखिका शकुंतला फडणीस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. जोशी बोलत होते. संस्थेच्या अध्यक्षा संगीता बर्वे, सहकार्यवाह आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, शकुंतला फडणीस यांच्या कन्या रूपा देवधर आणि लिना गोगटे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारूहास पंडित, बालरंजन केंद्राच्या अध्यक्षा आणि नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे सहभागी झाले होते.
शकुंतला फडणीस यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविताना डॉ. जोशी म्हणाले, शकुंतलाबाईंच्या वागण्या-बोलण्यात कधी अहंभाव दिसला नाही. उदंड आयुष्य जगल्या. आपली मते स्पष्टपणे मांडत आणि सार्वजनिक जीवनात वावरताना कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार असत. स्वत:वरही विनोद करताना त्यांच्यातील हजरजबाबीपणा दिसून येई.
शकुंतला फडणीस या शि. द. फडणीस यांच्या पत्नी होत्या तरी त्यांचे साहित्य क्षेत्रात वेगळे अस्तित्व होते. शि. द. फडणीस यांना त्यांनी आयुष्यभर साथ दिली. प्रेमळ व्यक्तिमत्त्व आपल्यात नाही यामुळे दु:ख होत असल्याचे चारूहास पंडित म्हणाले.
सुनील महाजन म्हणाले, बालसाहित्याच्या क्षेत्रात शकुंतला फडणीस यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. लेखन क्षेत्रात मोठे योगदान दिलेले असूनही त्यांचा वावर कायमच कार्यकर्त्यासारखा असायचा. संवाद पुणेतर्फे त्यांना श्रद्धांजली.
बालकुमार साहित्य संस्थेतील फडणीस यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करून संगीता बर्वे यांनी फडणीस यांचा बालसाहित्याच्या चळवळीत महत्वाचा सहभाग असल्याचे नमूद केले.
कथाकथन हे शकुंतला फडणीस यांचे बलस्थान होते, असे मत माधुरी सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेमळ अन् आनंदी असे होते. साहित्य क्षेत्रात नावलौकिक असूनही त्यांनी कधी मोठेपणा मिरविला नाही. बालरंजन केंद्राला फडणीस यांनी दिलेल्या भेटीप्रसंगीचे काही किस्सेही त्यांनी सांगितले.
साहित्याच्या क्षेत्रात आईचा वावर असला तरी तिचा घरातील वावर सर्वसामान्य गृहिणीसारखाच असायचा. साहित्याचे अनेक प्रकार तिने हाताळले. आई प्रागतिक विचारांची होती. तिने कधी धार्मिक अवडंबर माजवले नाही, असे रूपा देवधर म्हणाल्या.
आईच्या आठवणी जागवितांना लीना गोगटे म्हणाल्या, विविध विषयावर आईचे लिखाण असायचे. ते लिखाण ती आम्हाला आवर्जून दाखवायची. आम्ही काही बदल सुचविले तर ते आनंदाने स्वीकारायची. लिखाणाची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नसे. तिचे बालसाहित्य आम्हाला खूप भावले. साहित्यातून मुलांना तिने कधी उपदेशाचे डोस पाजले नाहीत.
पत्नी, सखी, सचिव अन् सहप्रवासी
माझ्या आयुष्याच्या वाटचालीतील शकुंतला पत्नी, सखी, सचिव अन् सहप्रवासी होती असे सांगून शि. द. फडणीस म्हणाले, मी हाती घेतलेले कार्य सहजसाध्य व्हावे यासाठी तिचा हिरिरीने पुढाकार आणि सहभाग असायचा. तिच्या जाण्याने व्यक्तिश: आघात झाला असला तरी तिच्या स्मृतींची शिदोरी मला पुढील वाटचालीस उपयुक्त ठरेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...