पंच मातांचा सत्कार म्हणजे सत्यम शिवम सुंदरम – माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर

Date:

पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे ,२७ मेः “आज पंच कन्यांचा नाही तर पंच मातांचा सत्कार होतांना आनंद होत आहे. ज्ञान हे सर्वात महत्वाचे असून ते सत्यम शिवम सुंदर असते. या मातांनी आपल्या कार्यातून हे ज्ञान दाखवून दिले आहे. तसेच संपूर्ण जगात एकोपाचा संदेश देण्यासाठी रामेश्वर हे गावाचा आदर्श जगात पोहचविणे गरजेचे आहे.”असे मत लोकसभेचे माजी सभापती व माजी  केंद्रीय  गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी मांडले.
विश्वशांती केंद्र (आळंदी),माईर्स एमआयटी, पुणे तर्फे रामेश्वर (रुई) येथे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या नवव्या पुण्यस्मरण स्मृतिदिनाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्माचा समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर  आदर्श निर्माण करणार्या पंचकन्यामध्ये, संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक व पुणे येथील पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा माता कृष्णा कश्यप, ज्येष्ठ समाजसेविका व थोर तपस्विनी शशिकला भिकाजी केंद्रे,  सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व ज्येष्ठ समाजसेविका डॉ. तेजस्विनी जनार्दन वाडेकर,  निवृत्त प्राचार्यां व आपुलकी या संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. ललिता शरद (नानासाहेब) गुप्ते आणि ज्येष्ठ समाजसेविका लक्ष्मीबाई महादु शेळके यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. २१,०००/- (रुपये एकवीस हजार) प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चाकूरकर बोलत होते.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
या वेळी ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आमदार रमेशअप्पा कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, कमल राजेखाँ पटेल, डॉ. हनुमंत कराड,  ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर व राजेश कराड हे उपस्थित होते.
शिवराज पाटील-चाकूरकरम्हणाले, “देशात ज्या प्रकारे चांगल्या गोष्टी आहेत तशाच  वाईट पण आहेत. सध्या देश जाती आणि धर्माच्या बंधनात अधिक अडकलेला दिसतो. मानवाला सुखी जीवन जगायचे असेल तर देशात चांगली परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे.
माझ्या ४८ वर्षाच्या राजकारणाच्या प्रवासात जगातील सर्व धार्मिक स्थळांना भेट दिली. त्यामध्ये रामेश्वर येथील राम मंदिरातील मूर्त्यां या सर्वात सौदर्यवान आहेत. सौदर्य काय असते हे मूर्त्यांच्या डोळ्यात पाहिल्यावर कळते. सौदर्य हा सत्याचा भाग आहे. जेथे सत्य प्रकट होते तेथेच मनामध्ये पवित्र भावना निर्माण होते. ही भावना धार्मिक स्थळांवर गेल्यावर कळते.
डॉ. विश्वनाथ कराड यांनी त्यांच्या गावी हिंदू मुस्लिमांचा नाही तर वैचारिक पूल निर्माण करून एकतेचे मोठे कार्य केले आहे. कोणी ही असो त्याला धर्माची भावना मोठी असते परंतू चांगुलपणा एकट्यामुळे नाही तर घरातील सर्व सदस्यांमुळे येत असतो.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “अक्कांची आठवण ही हदय स्पर्शी आहे. त्या शक्तीच्या स्त्रोत आहेत. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मुर्तीमंत प्रतिक त्यागमूर्ती अक्का आहेत. ईश्वर ही व्यक्ती नाही तर शक्ती आहे. आज संपूर्ण जगात आळंदीतून विश्व शांतीचा संदेश पोहचत असतांना रामेश्वर हे गाव मागे नाही. येथे मानव एकतेचे  मोठे प्रतिक निर्माण केले गेले आहे. हे गाव ज्ञान यज्ञ भूमी होते याचे काही पुरावे सापडले आहेत. आता अक्कांच्या नावाने दिला जाणारा पंच कन्या पुरस्कार आता सप्त कन्याने होणार आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांच्या स्मृति प्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन होतांना अतिशय समाधानाचे भाव अनुभवतो आहे.  त्यांच्याकडे पाहुनच देशातील राजकारणातील गढुळपणा काढून स्वच्छता कशी आणावी या साठी कार्य सुरू आहे.”
 डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “शिक्षणाच्या माध्यमातून जगभर झेंडा फडकविणारे डॉ. विश्वनाथ कराड यांनी अक्कांच्या प्रेरणेतूनच हे सर्व कार्य केले आहे. आमच्या एकत्रित कुटुंबात अक्का ही मायेचा झरा होती. अन्नपूर्णा अक्कांनी जो त्याग केला आहे.त्यामुळेच त्यांना त्यागमूर्ती असे संबोधिले जाते.”
रमेशअप्पा कराड म्हणाले,“कोविडच्या काळामुळे दोन वर्ष हा पुरस्कार देता आला नाही. याची खंत वाटते. बहिण भावाचे नाते काय असते हे अक्का आणि अण्णाभाऊंकडे पाहून कळते. अक्कांच्या आर्शीवादाने डॉ. विश्वनाथ कराड यांनी शिक्षण संस्था उभी केली. तसेच, भारतीय संस्कृती, अध्यात्मिक व सामाजिक कार्य अविरत सुरू आहे. एकत्रित कराड परिवाराचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असे कार्य अक्कांनी केले आहे.”
सर्व पुरस्कार्थीयांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. हनुमंत कराड यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...