मुंबई, दि.१७ डिसेंबर शिवसेना नेते संजय राऊत यांची वक्तव्ये आता बेताल व बेजबाबदार होत चालली आहेत. एकीकडे ते न्यायालयावर टिका करत असताना दुसरीकडे न्यायालयाने काय केलं पाहिजे अश्याप्रकरे मार्गदर्शन ते करू लागले आहेत. यावरून न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवला जात आहे ते लोकशाहीसाठी घातक आहे, आज त्यांनी न्यायालयावर आरोप केले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई गरजेची आहे अशी जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
न्यायालय कोणत्याही सरकारच्या विचारांवर चालत नसते. त्यामुळे या विषयावर अश्या प्रकारचा आरोप न्यायालयावर करणे चुकीचे आहे. त्यामुळे राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे असे सांगताना दरेकर म्हणाले की, देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटना लिहीली. या घटनेच्या माध्यमातून सर्वोच्च अशी न्यायव्यवस्था तयार करण्यात आली, पण जर त्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत अश्या प्रकारचे कोणी आक्षेप घेत असतील व न्यायालयाने काय करावे हे जर ते सांगत असतील तर यापेक्षा लोकशाहीसाठी दुर्दैव होऊ शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांचा न्यायालयावर आरोप :कायदेशीर कारवाई गरजेची -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date:

